जगप्रसिद्ध हापूस आंबा समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना करण्यात आला. याआधी आंबा भारतातून विमानामार्गे अमेरिकेला निर्यात व्हायचा. तुलनेत भारतीय हापूसचा दर जास्त असायचा. यावर उपाय म्हणून आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. हा देशाच्या ऐतिहासातील महत्वाचा क्षण असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे आंब्याचा वाहतुकीचा खर्च १० टक्क्यांवर आला आहे. शिवाय इतर देशांच्या आंब्यांच्या दरांच्या तुलनेत भारतीय हापूसचा दर स्पर्धात्मक असणार आहे.