पुणे / प्रतिनिधी :
पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून मी स्वतः कमी पडलो आहे. मला निकालाचे आत्मचिंतन करावे लागेल. मते कुठे कशी पडली आणि मी कुठे कमी पडलो हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी पराभवानंतर दिली.
पाच टर्म जे मतदार मुक्ता टिळक आणि बापट यांच्या पाठीशी उभे होते ते तुमच्या पाठिशी का उभे राहिले नाहीत, असा प्रश्न विचारला असता रासने म्हणाले, मी त्या मतांची आकडेवारी बघेन. त्यानंतर माझ्या लक्षात येईल. मी स्वतः उमेदवार म्हणून कमी पडलो, इतर फॅक्टरबद्दल मला बोलायचे नाही. पक्षाने मला उमेदवारी देत माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी पात्र ठरलो नाही. निवडणुकीत अनेक फॅक्टर असतात. आकडे बुथ नुसार पाहील. त्यानंतर कुठे कमी पडलो ते पाहू. पण जबाबदारी माझीच असते. हा निकाल मी विनम्रपणे स्विकारतो.
अधिक वाचा : भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार; कसब्यात काँग्रेसचे धंगेकर विजयी
2009 पासून मतदार संघाची रचना झाली तेव्हा हा एक लाखाचा कसबा तीन लाखांचा झाला. पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली, दोन विचारांचा पगडा असलेला मतदार विभागला गेला. या आधिच्या निवडणूका तिरंगी, सहारंगी झाल्या पण ही निवडणूक वन टू वन झाली याचा परिणाम झाला, असेल असेही रासने यांनी नमूद केले.