उत्तर प्रदेशातील हापूर येथील दुर्घटना
लखनौ / वृत्तसंस्था
पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूर जिह्यातील एका रासायनिक कारखान्यात शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. सुरुवातील बॉयलरचा स्फोट होऊन किमान सहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, चौकशीअंती येथे बेकायदेशीरपणे फटाके निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली. विद्युत उपकरणे निर्मितीचा परवाना घेऊन कारखान्यात फटाके बनविण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होते. शनिवारी फटाके बनवितानाच दारूगोळय़ाचा स्फोट होऊन 9 कामगारांना प्राण गमवावे लागले. तसेच अन्य 15 हून अधिक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
हापूरमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या फटाक्मयांच्या कारखान्यात स्फोट झाला. हा स्फोट एवढा जोरदार होता की, आजूबाजूच्या कारखान्यांच्या छताचे पत्रे आणि खिडक्यांच्या काचाही फुटल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातात 9 मजुरांचा मृत्यू झाला. तर 15 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना दिल्लीतील सफदरजंग आणि मेरठ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दारूच्या साठय़ाचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने बचावकार्य केले. ही घटना धौलाना पोलीस ठाणे परिसरातील आहे.
औद्योगिक युनिटमध्ये स्फोटाची घटना घडली असून कारखान्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी परवाना घेण्यात आला होता. साहजिकच येथे नियम व अटींचे उल्लंघन झाले आहे, याची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे घटनास्थळी पोहोचलेल्या आयजी प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केले. जिह्यातील धौलाना परिसरात असलेल्या कारखान्यात झालेल्या या दुर्घटनेत आणखी काही कामगार जखमी झाले. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. स्फोटानंतर कारखान्यामध्ये आग लागल्याने अनेक कामगार अडकून पडले होते. सदर कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाची मोठी मदत झाली. भाजल्याने आणि गुदमरल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या दुर्घटनेनंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते.
मुख्यमंत्र्यांकडून शोक संवेदना
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोकाकुल कुटुंबीयांप्रति ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱयांना घटनास्थळी जाण्याचे आणि बचाव आणि मदत उपायांचे निरीक्षण करण्याचे आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्मय ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.