शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींकडून मंदिरांवर हल्ल्याचा मुद्दा उपस्थित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रीडा आणि दृप्श्राव्य सहउत्पादन सहमतीं करार करण्यात आला आहे. शुक्रवारी दोन्ही देशांच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱयांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या. त्याचप्रमाणे सौरऊर्जा कृतीदल स्थापन करण्यासाठी सहमती करण्यात आली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांच्यात येथे शुक्रवारी वार्षिक शिखर परिषदेचा प्रारंम झ्ा़ला. ही परिषद आज शनिवारीही होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांसंबंधींही चर्चा केली. भारत-प्रशांतीय क्षेत्रातील सहकार्य या विषयावर विविध विचारांचे आदानप्रदान करण्यात आल्याची महिती आहे.
संयुक्त निवेदन
परिषदेच्या शुक्रवारच्या भागानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले. दोन्ही देशांनी परस्परांमधील संरक्षणविषयक संबंध आणि भागीदारी अधिक बळकट करण्यास मान्यता दिली. आर्थिक गुंतवणूक आणि व्यापारवृद्धी करण्यावरही भर देण्यात आला, अशीं माहिती अल्बानेस यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी गेल्या वर्षीच मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्य करार केला आहे. या कराराची व्याप्ती आणि प्रमाण वाढविण्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये व्यापक चर्चा सुरु आहे. लवकरच अधिक व्यापक करार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक करार लवकरच होणार
दोन्ही देशांमध्ये सर्वंकष आर्थिक सहकार्य करार लवकरच करण्यात येईल, अशी अशी अपेक्षा अल्बानेस यांनी व्यक्त केली. या करारासंबंधी 2021 पासून चर्चा सुरु आहे. ती आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहचली आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत हा करार होण्याची शक्यता अल्बानेस यांनी यावेळी व्यक्त केली.
पर्यावरण संरक्षणावर चर्चा
दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक पर्यावरण संरक्षण आणि हवामान परिवर्तन यासंबंधी चर्चा झाली आहे. जागतिक तापमानात घट करण्याच्या दृष्टीने प्रदूषण कमी करणे आणि ग्रीन हाऊस वायूंचे प्रमाण कमी करणे हे दोन्ही देशांचे ध्येय आहे. या संबंधी एकमेकांशी सहकार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेशी सेमीकंटक्टर करार
भारताने शुक्रवारी अमेरिकेशीही सेमीकंडक्टर उत्पादनासंबंधी महत्वपूर्ण करार केला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात संशोधन, तंत्रज्ञान आदानप्रदान, सहकार्य आदी मुद्दय़ांवर मोठय़ा प्रमाणात समन्वय राखला जाईल. यामुळे अमेरिकेचा ‘चिप कायदा’ आणि भारताचे ‘सेमीकॉन’ धोरण यांच्यातही समन्वय साधल जाणार आहे.
मंदिरांवरील हल्ल्याचा विषय गंभीर
ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. अशा हल्ल्यांमुळे आमचे मन व्यथित होते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांच्या भावना अल्बानेस यांच्यासमोर व्यक्त केल्या. मंदिरांचे संरक्षण अधिक सजगपणे होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अल्बानेस यांनीही या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती नंतर देण्यात आली.