डिचोली मतदारसंघात येत्या काळात मोठी विकास कामे. : 2024 केंद्रात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार.,माजी जि. पं. सदस्य संजय शेट्यो यांचा भाजपमध्ये प्रवेश.
डिचोली : डिचोली मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत काहीसा मागे राहिला असला तरी येणारा काळ हा या मतदारसंघासाठी सुवर्णकाळ आहे. कारण या मतदारसंघातील विशेषत: शहरातील अनेक विकास प्रकल्पांना येण्राया काळात पूर्ण स्वरूप प्राप्त होणार आहे. या मतदारसंघातील आमदारांचे बंधू संजय शेट्यो यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने डिचोलीतील पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळेच आता डिचोलीला विकासाच्या बाबतीत ठभिवपाची गरज नाठ अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे पक्ष प्रवेश सोहळ्यात दिली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांचे बंधू माजी जिल्हा पंचायत सदस्य डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, माछी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, डिचोली मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस तुळशीदास परब, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, डॉ. शेखर साळकर, अरूण नाईक, अर्जुन माळगावकर, तुळशीदास गावकर, नझिम शेख, सरपंच गुरूदास परब, सुबत्ता सामंत, तृप्ती गाड, महिला अध्यक्षा शर्मिला पळ, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, निलेश टोपले, दिपा पळ, सुदन गोवेकर, अँड. रंजना वायंगणकर व इतरांची उपस्थिती होती.
डिचोली मतदारसंघात येण्राया काळात विटासाची गंगाच वाहणार
डिचोली तालुक्यातून 80 टक्के मतदान भाजपला येण्राया लोकसभा निवडणुकीत पडायला हवी. व याच बळावर गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार हा विश्वास आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांना सदैव विकासाचा खुप ध्यास आहे. लाटंबार्से औद्योगिक वसाहत लवकर सुरू करण्याचे ध्येय आहे. त्यावर आपलेही विशेष लक्ष असून प्रदुषण न करणारे औद्योगिक प्रकल्प आणून पुढील वर्षभरात हजारभर बेरोजगारांना रोजगार देण्याचे ध्येय आहे. मोपा विमानतळापासून डिचोलीला थेट जोडणारा रस्ता तसेच इतरही भागातून डिचोली जोडणारे रस्ते तयार करण्याचे सोपस्कार सुरू आहेत. डिचोलीचा बायपास पावसापूर्वी पूर्ण होणार. डिचोलीतील महत्वपूर्ण प्रशासकीय इमारतीची लवकरच पायाभरणी घातली जाणार आहे. गावातही विकास प्रकल्प आणताना स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी प्रयत्नरत आहे. गावासाठी व गोव्यासाठी चांगला असलेल्या प्रकल्पाला कधीही विरोध करू नये. उसप गावात कणेरीच्या धरतीवर मठ स्थापन होणार असून तेथे दिवसा एक हजार पर्यटक पाहण्यासाठी येणार. त्याचा लाभ या गावाबरोबर डिचोली मतदारसंघाला होणार. यापुढे सरकारी नोक्रया कर्मचारी निवड संस्थेतर्फे होणार असून त्यत डिचोलीवर अन्याय होणार नाही याची खबरदारी आपण घेणार. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय
सर्वांचे मनोमिलन करून एकजुटीने काम करण्यासाठी आम्ही सर्वजण पुढे आलेले आहे. भाजपचे केंद्र व राज्य यामध्ये चालू असलेले काम, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या संकल्पनेतून काम करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपण या पक्षात आलेलो आहे. हि संधी भाजपने आम्हाला दिली असून या संधीचे सोने करण्यासाठी आपण धडपडणार. सर्व भाजप नेत्याच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कार्य करण्यावर आपण जोर देणार. डिचोली मतदारसंघाचा विकास तसेच बेकारी हटविण्यासाठी हा निर्णय आपण सर्व कार्यकर्ते व हितचिंतकांना सांगून घेतलेला आहे. त्याची साक्ष या कार्यक्रमात जमलेला जनसमुदाय आहे, माजी जि. पं. सदस्य संजय शेट्यो यांनी यावेळी असे म्हटले. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, माजी सभापती राजेश पाटणेकर यांनीही आपले विचार मांडले. सजय शेट्यो यांना रितसर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांच्या बरोबर मेणकुरे धुमासे, मुळगाव या पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, अडवलपाल पंचायतीचे पंचसदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वागत मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर यांनी केले. सूत्रसंचालन राजन कडकडे यांनी केले, तर आभार अरूण नाईक यांनी मानले. या पक्ष प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
होय.. म्हादई हि माझ्या मातेसमान आहे, तिच्या रक्षणासाठी सर्व ते प्रयत्न करणार..
यावेळी आपल्या भाषणात होय..म्हादई हि माला मातेसमान आहे, व तिच्या रक्षणासाठी सर्व ते प्रयत्न करणार… असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. म्हादईच्या रक्षणासाठी आपण गांभीर्याने पाठपुरावा करीतच आहे. जल वाटप प्राधिकरण स्थापन होऊन लवकरच अधिसूचित होणार असून त्यानंतर राज्य सरकारचे म्हादईसाठीचे योगदान आणि प्रयत्न समोर यूणार आहेत. म्हादई विकण्याचा घाट काँग्रेस पक्षाने रचला होता. लवकरच विरोधकांचे पितळ उघडे पडणार व विरोधकांचे कारस्थान उघडकीस येमार आहे. आज या लढ्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे आमची बाजू मजबूत होत आहे. विरोधकांनी कितीही विरोध करावा. पदयात्रा काढाव्यात, त्याचा काहीच फरक पडणार नाही. सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून आपण म्हादई वाचविण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहे. असे मुख्यमंत्री डॉ.. सावंत म्हणाले