ऑनलाईन टीम/तरुण भारत
मध्यप्रेदशात सर्वांना परिचित असणारे वाहतूक पोलीस हवालदार रणजित कुमार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी इंदौरमध्ये डान्स करून वाहतूक नियंत्रित करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनतर ते सर्वत्र चर्चेत आले होते. आत पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत. रणजीत यांनी आता असं काही काम केलं आहे. ज्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. एवढंच काय तर रणजित आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा होऊ लागली आहे.
ट्राफिक हवलाद रणजित पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारणही तसेच आहे. रणजित ड्युटीवर असताना दोन मुले त्यांच्या समोरून रस्ता ओलांडत होते. त्यांपैकी एका मुलाच्या पायात चप्पल नव्हती. ज्यामुळे त्याने रणजीत यांना सांगितले की, त्याचे पाय उन्हामुळे भाजत आहेत. त्यावेळी हवालदार रणजीत यांनी त्या मुलाला सांगितले की, जोपर्यंत वाहतूक थांबत नाही, तोपर्यंत तू तुझे दोन्ही पाय माझ्या पायावर ठेव.
रणजीत सिंग यांनी स्वत: ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी फोटो देखील शेअर केले आहेत.खरंतर हे फोटो शेअर करताना हवालदार रणजीत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.रणजीत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुलांचे फोटोही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये दोन मुलं त्यांच्या बाजूला उभी आहेत. तर त्यांपैकी एका मुलाने त्याचे पाय रणजीत यांच्या पायावर ठेवले असल्याचे दिसत आहे.लोक त्यांच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत. काही जण त्यांना वंदन करत आहेत, तर काही त्यांच्या कार्यावर आपलं मत व्यक्त करत आहेत.याआधीही रणजीतने अनेकवेळा ट्रॅफिक कंट्रोल करून अनोकांचे जीव वाचवण्यात मदत केली आहे.