ऑनलाईन टीम
लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज आत्मविश्वासाने मैदानात उतरली. मात्र, पराभवातून सावरत इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन केले. पहिल्या डावात ब्रिटिश गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय संघाचा ७८ धावांत खुर्दा उडवला. रोहित शर्मा १९ (१०५ चेंडू) आणि अजिंक्य रहाणे १८ (५४ चेंडू) वगळता एकाही खेळाडूला दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. जेम्स अँडरसनने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. त्याने के.एल. राहुल (०), पुजारा (१) आणि विराट कोहली (७) यांना माघारी धाडले. त्यानंतर रॉबिन्सन, सॅम करन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी भारताच्या डावाला खिंडार पाडले. ब्रिटिश गोलंदाजांच्या माऱ्यापुढे टीम इंडियाचा डाव ४०.४ षटकांत अवघ्या ७८ धावांवर गुंडाळला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पहिल्या दोन सामन्यात भारत १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला असून लॉर्ड्स कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन