ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राम देव नव्हते. ते वाल्मिकी आणि तुलसीदासांच्या रामायणातील एक पात्र होते. रामायण लिहिणाऱ्यांवर माझा विश्वास आहे. पण रामावर नाही, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (Jitanram mazi) यांनी गुरुवारी केले. मांझी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सिकंदरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मांझी म्हणाले, राम देव नाही. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदासांवर माझा विश्वास आहे. पण, रामाला मी ओळखत नाही. राम हे वाल्मिकी आणि तुलसीदासांच्या रामायणातील एक पात्र होते. पुजा-पाठ करून कोणीही मोठं होत नाही. अनुसूचित जातीच्या लोकांनी पूजा करणे बंद करावे, असेही मांझी म्हणाले. मांझी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
मांझी यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मिथिलेश तिवारी म्हणाले की, काही लोकांना वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहायचं आहे. ते नेहमी अशी वक्तव्ये करतात. त्यांच्या मेंदूवर उपचार व्हायला हवेत. जर कोणी रामाला कल्पनारम्य म्हटले, तर मी हसतो, कारण राम नाही तर भरतवर्षा नाही. पण ते म्हातारे आहेत, त्यांचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा