प्रतिनिधी /खानापूर
मंदिरांच्या माध्यमातून समाज घडतो, समाजात अध्यात्मिक वातावरण निर्माण होते. मंदिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील एकी आजही टिकली आहे. यासाठी ग्रामीण भागातील जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्वार झाला पाहिजे, यासाठी मी सर्वतोपरी मदत करत आहे. आज सगळीकडे फक्त राजकारण सुरू आहे. परंतु मी माझ्या समाजकारणाचा वसा निरंतर सुरू ठेवला आहे. तो यापुढेही सुरुच ठेवेन. शिक्षण व आरोग्य हे माझे दोन जिव्हाळय़ाचे विषय आहेत. त्यासाठी माझे काम सुरू आहे, असे उद्गार आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्मयातील भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराच्या कॉलमभरणी कार्यक्रमाच्यावेळी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भांबर्डा येथील ज्ये÷ नागरिक कृष्णाजी पेडणेकर होते. प्रारंभी विविध देवतांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर कॉलमभरणी कार्यक्रम करण्यात आला. भांबर्डे कलमेश्वर मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा संकल्प गावकऱयांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कॉलमभरणी कार्यक्रम करण्यात आला.
मंदिरासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी आमदार फंडातून पाच लाख तसेच वैयक्तिक 200 पोती सिमेंट देणगी दिली आहे. यावेळी हलशी, घोडगाळी, कापोलीचे गावकरी उपस्थित होते. हलशी ग्रा. पं. अध्यक्षा मुनेरा संगोळ्ळी, उपाध्यक्ष संतोष हांजी, सदस्य निंगाप्पा होसूर, अनिल सुतार, तमन्ना कोलकार, महेश मादार, महांतेश कल्याणी, हलशीवाडीचे साईश सुतार, घोटगाळी पंचायतचे अमर कुंभार, घोटगाळीचे श्रीकांत देसाई, पुणे येथील उद्योजक उपस्थित होते.