धामोड : येथील तुळशी जलाशय परिसरात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जलाशय सध्या ८३ टक्के इतके भरले असून धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार असल्याची माहीती येथील शाखाअभियंता खंडेराव गाडे यांनी दिली असुन तुळशी नदिकाठच्या राधानगरी व करविर तालुक्यातील नागरीकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे .
तुळशी धरण क्षेत्रात गेल्या १२ तासात ७३ मी मी पाऊस झाला असुन मुसळधार पाऊस कोसळत आहे . शिवाय अंतर्गत ऊगाळ , पाऊस व केळोशी प्रकल्पाच्या सांडव्यातून जवळपास १६०० क्युसेक्स पाणी जलाशयात जमा होत आहे . त्यामुळे धरणातील पाणि पातळी झपाट्याने वाढत आहे .६१६ .९१ मीटर पाणी पातळीला धरण पुर्ण क्षमतेने भरत असुन सायंकाळी पाच वाजता ६१३. ७५ मिटर पाणि पातळी झाली आहे . मुसळधार पाऊस व पाण्याचा येवा विचारात घेता नदिकाठची पुरस्थीती नियंत्रीत करण्यासाठी कोणत्याही क्षणी पाणि सोडणार असल्याचे सांगितले आहे .
तुळशी नदी काठच्या धामोड, लाडवाडी, चांदे, कोते तर करवीर तालुक्यातील मांजरवाडी, घानवडे, घुंगुरवाडी, कांचनवाडी, म्हालसवडे ,पाटेकरवाडी, चाफोडी, शिरोली ,हिरवडे ,आरे बीडसह सर्व गावातील नागरीकांनी विद्युत पंप व नदीकाठी असणारे जनावरांचे गोठे पुर परिस्थीती नियंत्रीत होपर्यंत अन्यत्र हलवावेत असे आवाहन शाखा अभियंता खंडेराव गाडे व एस जी सावेकर यांनी केले आहे