शिवसेना ( ठाकरे गटाचे ) नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या सर्वोच्च पदावरून पायउतार झाले या गोष्टीचे त्यांनी स्वागत केले. राज्यपाल भगतसिंह कोशारी हे “महाराष्ट्रविरोधी राज्यपाल” असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, हा महाराष्ट्राचा मोठा विजय आहे. भगतसिंह कोशारी यांनी या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केला होता. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सकाळी कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला.
आपल्य़ा टि्वटर अकाउंटवरून पोस्ट करताना ते म्हणाले, “महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले याचबरोबर आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाहीच्या मुल्य़ांचे सातत्याने अपमान करणाऱ्यांना राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही” असे ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही कोश्यारी यांच्या बाहेर पडण्यावर प्रतिक्रिया दिली. “राज्यपाल बदलणे हे महाराष्ट्रावर उपकार नाही, अनेक राज्यपाल बदलले आहेत. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर कोशियारी .यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोक राज्यपाल बदलण्याची मागणी एक वर्षापासून करत होते.