ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लिंगायत समाजाच्या 70 ते 80 टक्के मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेला मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
विजय हतुरे म्हणाले, लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांसोबत बोलण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आले. त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळात बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी मान्य केली. बसवेश्वर यांच्या नावाचं विद्यापीठ तयार करण्यासाठी मान्यता द्यावी, ही मागणीही सरकारने मान्य केली. तसेच येणाऱ्या अधिवेशनापूर्वी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मान्य होईल. समाजाच्या अशा 70 ते 80 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. काही विषय केंद्राचे आहेत. त्यासाठी लढाई सुरू राहिल.
अधिक वाचा : आपला संकुचितपणा मराठीसाठी घातक
राष्ट्रीय स्तरावर कोणत्या धर्माला मान्यता द्यायची याचा अभ्यास सुरू आहे. यासाठी कायद्याचा ही अभ्यास सुरू झाला आहे. भाषिक अल्पसंख्याक म्हणून अनेक सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे, असेही ते म्हणाले.