नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 या दिवशी घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनला आज तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्या लॉकडाऊनमुळे देशभरातील बहुतेक व्यवहार ठप्प झाले होते. तथापि, कोरोनाचे वाढते संकट रोखण्यासाठी त्याची अत्याधिक आवश्यकता होती. भारताप्रमाणेच अनेक देशांनी वेगवेगळय़ा वेळी पूर्ण लॉकडाऊन लागू केलेला होता. भारतातील लॉकडाऊनचा प्रथम कालावधी 3 आठवडय़ांचा होता. नंतर आवश्यकतेनुसार त्याची कालमर्यादा वाढविण्यात आली होती.