ऑनलाईन टीम/तरुण भारत
खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र मुंबई पोलिसांनी (mumbai police) सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती. यांनतर राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी नसुनावली होती. पण नवनीत राणा यांनी अटक केल्यांनतर पोलिसांनी आपल्याला मागासवर्गीय असल्याने योग्य ती वागणूक दिली नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे याची दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla Speaker of the Lok Sabha) यांनी राज्य सरकारकडून याविषयी माहिती मागविली आहे. (after Navneet Rana arrest loksabha speaker asked for details)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून येत्या २४ तासात सविस्तर अहवाल मागवली आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानूसार गृहमंत्रालया मार्फत ही माहिती मागवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खार पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणूकीबाबत महाराष्ट्र सरकारविरोधात तक्रार केली होती.
नवनीत राणा यांनी पत्रात काय म्हटलं आहे ?
“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. मात्र माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे. अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.