मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागातील ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.३५ टक्के असून, मुलांची टक्केवारी ९३.२९ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी २.०६ टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १७ जून रोजी त्यांच्या कॉलेजमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून गुणपत्रिका मिळणार आहेत.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
https://mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://hscmahresult.org.in
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
मुंबई – ९०.९१
कोकण – ९७.२१
पुणे – ९३.६१
नागपूर – ९६.५२
औरंगाबाद – ९४.९७
कोल्हापूर – ९५.०७
अमरावती – ९६.३४
नाशिक – ९५.०३
लातूर – ९५.२५
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन