Maharashtra Monsoon Session 2022 : पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून अनेक मुद्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तर सत्ताधाऱ्यांनी देखील टिकेला उत्तर दिले. त्याचबरोबर विधानसभेत सादर केलेल्या प्रस्तावाला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन प्रस्तावासंदर्भात माहिती दिली. यामध्ये औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.याबरोबरचं नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे.
राज्यातील अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र गुन्ह्यात ११ व्या क्रमांकावर आहे. ठाण्यातील डान्सबारवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत माहिती घेण्यात आली आहे. लवकरच डान्सबारवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर अंमली पदार्थाबाबत जून 2022 पर्यंत 6622 गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
Previous Articleगुरुवारी बिबट्याचे पुन्हा दर्शन
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.