बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्थर उंचावणार, कर्जपुरठय़ासह प्रशिक्षणाची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
बचत गटात आतापर्यंत दारिद्रय़रेषेखालील गटांना प्राधान्य देण्यात येत होते. त्यामुळे काही गटांचाच आर्थिक स्थर उंचावत होता. याचा विचार करुन केंद्र सरकारने प्रत्येक गटातील आर्थिक स्थर उंचावण्यासाठी इंटेन्सिव्हमध्ये समावेश करून त्यांच्या कामांना चालना दिली. आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात या गटांतून अनेक महिलांना सहकार्य मिळत असून तालुका व जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
जिह्यात आतापर्यंत 2 हजार 300 हून अधिक बचत गटांचा समावेश असून याची वॉर्डनिहाय रचना करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डाला 5 लाख रुपयांचा निधी देवून बचत गटातील महिलांना उद्योग व व्यवसाय थाटून त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बचत गटातील महिलांना रोजगार मिळत आहे. याबरोबरच त्यांना विविध माध्यमांतून कामेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नुकतीच अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये तिरंगा शिवनावळीचे कामही याच महिलांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारचे पाऊल
ग्रामीण भागातील दारिद्रय़ कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत देशातील विभागांना इंटेन्सिव्ह व नॉन इंटेन्सिव्ह अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. बचत गट चळवळीने महिलांना आर्थिक बळ दिले खरे पण, आतापर्यंत केवळ दारिद्रय़रेषेखालील गटांनाच प्राधान्य दिले जात होते.
आता बेळगाव जिह्याचा समावेश इंटेन्सिव्हमध्ये करण्यात आल्याने सर्व बचत गटातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून त्यांच्या सबलीकरणासाठी सरकारने चांगली वाट निवडल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक तालुक्यात कर्मचारी वाढणार
बेळगाव जिह्याचा समावेश इंटेन्सिव्हमध्ये करण्यात आल्याने आता जिल्हा पंचायत कार्यक्षेत्राबरोबरच तालुक्मयातील कर्मचाऱयांमध्येही वाढ होणार आहे.
सर्वच कामांच्या उद्दिष्टात वाढ
महिलांना कर्ज वितरण करणे, उद्योग सुरळीत चालतो की नाही याची पाहणी करणे याचबरोबर इतर कामेही लागणार आहेत. कर्ज वितरणबरोबरच सर्वच कामांच्या उद्दिष्टात काही पटींनी वाढ होणार आहे. त्यामुळे किमान 10 ते 15 जणांना नोकरी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन हजार 364 बचत गट
बँकांकडून शून्य व्याजदराने, विनातारण, विनाकारण पाच लाखांहून अधिक रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जात आहे. दहा लाखापर्यंत एका ग्राम पंचायतीला कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार असून बचत गटांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे आता गावागावात महिलांचे सबलीकरण करण्यास मदत होणार आहे. दरम्यान जिह्यात बचत गटांची माहिती विभागवार घेण्यात आली असून एका विभागात सुमारे पाच बचत गट घेण्यात आले आहेत. त्यामुळे एका ग्राम पंचायतीमध्ये पाचहून अधिक बचत गट असल्यास दुसऱया विभागात त्यांची वर्णी लावून त्यांना या योजनेचा फायदा करुन देण्यास मदत करण्यात येत येत आहे. त्यामुळे बेळगाव जिह्यात सध्या 378 विभागवार बचत गटांच्या नोंदी झाल्या असून एकूण 2 हजार 364 बचत गटांचा यामध्ये समावेश आहे.