ऑनलाईन टिम : हैदराबाद
केंद्रातील एनडीए सरकार राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा कट रचत आहे, तसेच भाजपेत्तर राज्याबरोबर तेलंगणासोबत भेदभावही हा भेदभाव केला जात आहे असा आरोप करून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फक्त भाजपच नाही तर आतापर्यंत केंद्रात सत्तेवर असलेल्या सर्व सरकारांनी राज्यघटनेच्या भावनेला तडा देऊन राज्यांची स्वायत्तता संपवली, असे ते म्हणाले. तेलंगणा राज्य स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
आपल्या भाषणात बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले,”सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार “सशक्त केंद्र आणि कमकुवत राज्ये” या सिद्धांतावर चालत आहे. त्यामुळेच एनडीए सरकारच्या कारकिर्दीत राज्यांच्या अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.”
पुढे बोलताना म्हणाले केसीआर म्हणाले की, “केंद्र सरकार राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचत असून, राज्यांचा संवैधानिक हक्क मारण्यासाठी केंद्र सरकार उपकराच्या रूपात कर बदल करत आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांचे लाखो कोटी रुपयांची उधळपट्टी होत आहे. केंद्र मनमानीपद्धतीने विविध प्रकारचे निर्बंध लादून राज्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. राज्यांनी एफआरबीएमच्या तरतुदींचे पालन करावे असा केंद्राचा आग्रह असला तरी तेलंगणा राज्याने तसे वर्तन केले नाही. असे राव म्हणाले.