ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackreay) यांच्या मातोश्री (matoshree) बंगल्याबाहेर हनुमान चालीसा (hanuman chalisa) पठण करण्यासाठी शिवसैनिकांना चकवा देत खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि रवी राणा (ravi rana) हे दाम्पत्य मुंबईत (mumbai) दाखल झाले आहे. या प्रकरणावर खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. हनुमान चालीसा पठण करणे हा स्टंट करण्याचा विषय आहे का? पण भाजप अशा धार्मिक विषयांचाही आता स्टंट करत आहे. त्यातील राणा दाम्पत्य हे एक पात्र आहे. हे सिनेमातले बंटी आणि बबली आहेत. त्यामुळे ही त्यांची फिल्मी स्टंटबाजी असेल, त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, भापला आता स्टंटसाठी फिल्मी लोकांची गरज लागते. धार्मिक विषयांचाही ते स्टंट करू पहात आहेत. त्यासाठी त्यांनी या सिनेमातल्या बंटी आणि बबलीची निवड केली. हे बंटी-बबली मुंबईत स्टंटसाठी पोहचलेच आहेत. तर त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. हनुमान चालीसा वाचणं हा धार्मिक विषय असून, त्याचा स्टंट करणे चुकीचे आहे. लोकही त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही हिंदू सण साजरे करतो. आम्हाला हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही.
दरम्यान, माताश्रीबाहेर शिवसैनिकांची संख्या वाढत आहे. पोलिसांनी बंदोबस्तातही वाढ केली आहे. राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झाले आहे. त्यांचे बुकींग ज्या नंदगिरी गेस्ट हाऊसला आहे, त्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली असून, शिवसैनिकांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आहे.