कोळिसरे गावातील घटना, – जयगड परिसरात खळबळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील जयगड नजिकच्या कोळिसरे कोठारवाडी येथे नवदाम्पत्याने गळफासाने आत्महत्या केल़ी ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल़ी एकाच दोरखंडाला जोडप्याने गळफास घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आह़े या जोडप्याचा केवळ एका महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेला असताना आत्महत्येमागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाह़ी या घटनेची नोंद जयगड पोलिसांकडून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आह़े
संदीप जयवंत गोताड (27) व पूजा संदीप गोताड (25) अशी मृतांची नावे आहेत़ दोघांचेही मृतदेह स्वयंपाकघरातील लाकडी भालाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आह़े घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप व पूजा यांचा मागील महिन्यात प्रेमविवाह झाला होत़ा संदीपला दारूचे व्यसन होते तर पूजाचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याची चर्चा आहे मात्र लग्नानंतर दोघेही चांगले वैवाहिक जीवन जगत होते, असे सांगण्यात येते. असे असताना दोघांनीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाह़ी दोघेही असे टोकाचे पाऊल उचलतील अशी पुसटशीही कल्पना नसल्याने नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आह़े
रविवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े घटनेचा पंचनामा करून मृतदेह खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य पेंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आल़ा प्राथमिक तपासामध्ये आत्महत्या असल्याचे आढळून येत असले तरी पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आह़े दोन्ही मृतदेहांचा व्हिसेरा रासायनिक परिक्षणासाठी राखून ठेवण्यात आला आह़े पोलिसांकडून नातेवाईकांकडे अधिक चौकशी करण्यात येत आह़े
नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच दोरीला जोडप्याने गळफास घेतल्याचे समजताच विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत़ दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े