ही कथा आहे 100 वर्षांमधून पृथ्वीवासियांना एकदाच दर्शन देणाऱया ताऱयाची. राजापूरची गंगा बऱयाचदा कोरडी असते. पण तिला केव्हावी पाणी येऊ शकते. इतर वेळी ती ‘गुप्त’ असते. तसाच हा अवकाशातील प्रकार आहे. हा एक दुर्लभ तारा मानला जातो. तो नित्य नेमाने 100 वर्षांतून एकदा विशिष्ट वेळेला दिसतो, असेही नाही. पण एकदा दिसला की किमान 100 वर्षे तरी तो दिसत नाही. या ताऱयाचे खगोल वैज्ञानिकांना नेहमीच कौतुक वाटत आले आहे. तसेच त्याच्या प्रदीर्घ काळ गुप्त राहण्याचे रहस्य हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
अवकाशात काही वर्षांपूर्वी संशोधकांना सतत 7 वर्षे एका ताऱयाला लागलेले ग्रहण दिसून आले. त्याचे संशोधन करत असताना, या थोडा वेळ चमकून गुप्त होणाऱया ताऱयाचा शोध लागला. संशोधक निरीक्षण करत असताना ग्रहणपरिसरातील एक अतिशय मंद तारा अचानक तेजाळू लागला आणि चमकदार झाला. त्याला आता ‘गाईया 17 बीबीपी’ असे नाव देण्यात आले आहे. हा एक तारा नसून त्याच्यासह आणखी एक अधिक तेजस्वी तारा आहे. या सहताऱयामुळे या ताऱयाचे तेज कमी झाले. त्यामुळे तो साध्या डोळय़ांना दिसू शकत नाही. मात्र, 100 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांनंतर अचानक या ताऱयातील तेज आणि उष्णता जागी होते आणि तो तेजाने तळपू लागतो. याच कालावधीत त्याचे दर्शन पृथ्वीवरुन होऊ शकते. हा चमत्कार नसून ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे असे स्पष्टीकरण वैज्ञानिक देतात. या ताऱयाचा जो मोठा जोडीदार तारा आहे ते अतिशय प्रखर तेजाचा आहे. त्यामुळे त्याचेच दर्शन होत राहते. याच मोठय़ा ताऱयापासून ऊर्जा घेऊन काही वेळा छोटा तारा अधिक तेजाने चमकू लागतो आणि त्याचे दर्शन संशोधकांना होते. असे अनेक जोडतारे आहेत.