ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे चिंचवड पोटनिवडणुकीत मविआचा उमेदवार पडला असं सांगितलं जात आहे. मात्र, यात कोणतंही तथ्य नसल्याचा दावा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने मविआचा उमेदवार पडला यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे निवडून आले असते, असं का नाही म्हटलं जात, असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला. कसब्यातील पराभव सरकारच्या विरोधातील निर्णय आहे. तसेच सरकारच्या नाकरत्या कामाचे जनमत आहे. धंगेकर यांनी चांगली बांधणी केली म्हणून त्यांना अधिक मत मिळाली. कसब्यातील विजय पक्षाचा नाही तर धंगेकर यांचा आहे.
अधिक वाचा : बारावी पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षकांसह 5 जणांना अटक