अस्थिर स्थिती पाहता मविआ सरकारच अंदाधुंद, घाईघाईने निर्णय घेत आहेत. त्यामुळे तुम्ही आता हस्तक्षेप करा अशा आशयाचे पत्र भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पाठवले आहे. घाईघाईनं जीआर जारी होत आहेत, हस्तक्षेप करा अशी मागणी भाजपाने केली आहे. कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो असा उल्लेखही या पत्रात केला आहे.
काय म्हटलं आहे या पत्रात
-राज्यातील राजकीय स्थिती ही मागील तीन दिवसांत अत्यंत अस्थिरतेची बनली आहे.
-शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे.
-मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.
-महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
-राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे.
-कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे.
-आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत.
-विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे.
-अडीच वर्षे निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. -पोलीस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. यापूर्वी पोलीस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तुरूंगामध्ये जावे लागले आहे.
Related Posts
Add A Comment