पुढील महिन्याच्या 18 तारखेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उत्तराधिकाऱयाची निवडणूक होणार आहे. येत्या पंधरवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराची निवड करणार आहे. तो कोणत्याही जातीधर्माचा असला तरी मावळत्या राष्टपतींप्रमाणे मोदींचा ‘होयबा’ असणार आहे हे नक्की. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असेलही पण त्यातील एकही नेता जाहीरपणे पुढील राष्ट्रपती कोण असेल अथवा असावा याबाबत अवाक्षरही काढत नाही यावरून संघटनेवर मोदींची किती घट्ट पकड आहे हे दिसत आहे. आपल्या हातात काहीच नाही, उगीच बोलून तोंडाची वाफ कशाला दौडवायची असा सूज्ञ विचार भाजपाई करताना दिसतात. 2017 साली कोविंद यांच्या निवडीचा खेळ पंतप्रधान तसेच तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्तपणे खेळला होता. पक्षातील कोणाला देखील या उमेदवारीबाबत माहित नव्हते. कोविंद यांना स्वतःला देखील एव्हढी मोठी लॉटरी आपल्याला लागेल याची सुतराम कल्पना नव्हती.
‘आपण बरे आपले काम बरे. समोर बघून चालायचे. दुसऱयाकडे लक्ष द्यायचे नाही. कोणत्याही वादापासून दूर राहायचे. श्रे÷ाrंचा आदेश अगदी मनापासून पाळायचा. कोणताही प्रश्न न विचारता’, असे नि÷ावंतांचे सारे गुण मावळत्या राष्ट्रपतींच्या कुंडलीत दिसले आणि पुढे काय घडले तो इतिहास आहे.
या निवडणुकीतदेखील इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. नवीन ‘कोविंद’ चा शोध सुरु झाला आहे. मोदींनी तो आत्तापर्यंत संपवला देखील असेल आणि सदरहू नेत्यास विश्वासात घेऊन ‘तयार रहा’ असा आदेशदेखील दिला असेल आणि घोषणा होईपर्यंत ‘तोंड एकदम बंद ठेवायचे आहे’ असे सांगितले देखील असेल. गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय तिसऱया कोणा नेत्याला त्याबाबत अजिबात माहिती नसेल. संघ परिवाराची पसंती कोणती आहे हे देखील अजूनतरी गुलदस्त्यात राहिले आहे. गेल्या वेळी संघाने मुरली मनोहर जोशी यांच्या नावाचा पाठपुरावा केला होता पण झाले होते भलतेच. म्हणूनच आता सर्वजण फुंकून फुंकून ताक पित आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर लवकरच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होईल. सध्या एक गोष्ट स्पष्ट आहे, की कोविंद अथवा वेंकय्या नायडू यांना दुसरी टर्म मिळण्याची शक्मयता नाही तसेच नायडू यांना राष्ट्रपती म्हणून बढती मिळण्याची शक्मयता नाही. नायडू यांनी राज्यसभेचे सभापती म्हणून जे काम केले त्याने मोदी खूष नाहीत अशी कुजबुज सत्ताधारी वर्तुळात ऐकायला मिळत आहे. नायडू हे महत्वाकांक्षी आहेत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले असल्याने ‘होयबा’ बनू शकत नाहीत हे जाणकार सांगतात. सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून कामगिरी न आवडल्याने त्यांना त्यांनी आठ वेळा जिंकलेल्या इंदोर मतदारसंघातून तिकीट देखील दिले गेले नाही. ‘तुम्हाला तिकीट मिळणार नाही असे न सांगितल्याने त्या अंधारात राहिल्या आणि सरतेशेवटी रागानेच त्यांनी मी निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले.’ त्यांना नंतर राज्यपाल देखील बनवण्यात आलेले नाही.
पुढील राष्ट्रपती म्हणून सध्या राजकीय वर्तुळात तरी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे नाव पुढे आहे. गेहलोत हे मध्यप्रदेशमधील असून भाजपचे एक प्रमुख दलित नेते आहेत. अरुण जेटलीनंतर काही काळ राज्यसभेचे नेते राहिलेले आहेत. मोदींना गुजरातमधील कोणा नेत्याला राष्ट्रपती करण्याचे मनात असेल तर उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची वर्णी लागू शकेल. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि ओरिसाचे राज्यपाल गणेशी लाल हे देखील मोदींच्या जवळचे समजले जातात. धनकर मूळचे राजस्थानचे आहेत व जाट समाजातील आहेत. लाल हे हरियाणातील आहेत. भगवद गीतेचे अभ्यासक आणि एक विद्वान आहेत. विशेष म्हणजे जर आनंदीबाईंना राष्ट्रपती बनवण्यात आले नाही तर त्यांना उपराष्ट्रपती जरूर बनवण्यात येईल असे भाजपमधील एक गट मानतो. गेल्या वीस वर्षात कोणाही उपराष्ट्रपतीला बढती मिळालेली नाही.
याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आठ वर्षांपूर्वी सत्तेत आलेले मोदी अचानक पुढील राष्ट्रपती मुस्लिम समाजातील करणार काय? यावर उलटसुलट चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ती कितपत बरोबर अथवा चूक ते येत्या पंधरवडय़ात दिसणार आहे. नुपूर शर्मा यांनी भाजप प्रवक्ता या नात्याने प्रेषित मोहम्मद पैगंबराविषयी जे वादग्रस्त विधान केले त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरुद्ध एक वणवाच पेटला आहे. खाडीतील झाडून सारे मुस्लिम देश तसेच मलेशिया आणि इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश एकसाथ भारताच्या विरोधात उठलेत. अमेरिकेने भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोदी सरकारला अगोदरच फैलावर घेतले होते. त्याला परराष्ट्रमंत्री जय शंकर यांनी तिखट प्रत्युत्तर दिले असले तरी ते प्रकरण पूर्णपणे मिटलेले नाही. युपेनच्या युद्धात रशियाची बाजू घेऊनदेखील प्रेषित प्रकरणी व्लादिमिर पुतीन यांनी भारताला सुनावले आहे. चीन आणि पाकिस्तानचे गुळपीठ वाढत आहे. तात्पर्य काय जगात भारत एकटा पडू लागला आहे. अशावेळी जगाला संदेश देण्याकरता मोदी एखाद्या मुस्लिम नेत्याच्या गळय़ात राष्ट्रपतीपदाची माळ घालून निषेध करणाऱया देशांची तोंडे बंद करतील असे बोलले जात आहे. मात्र नि÷ावंत तसेच मोदींचे टीकाकारदेखील पंतप्रधान असे काही करतील यावर विश्वास ठेवत नाहीत. ‘ज्यांनी लालकृष्ण आडवाणींना राष्ट्रपती बनू दिले नाही ते कोणा मुस्लिमाला हे पद देतील हे शक्मय नाही’ असे स्पष्ट मत एका विरोधी नेत्याने दिले. मुस्लिम समाजाच्या आंदोलनामुळे मोदींची हिंदू मतपेढी घट्ट होते आहे. त्यामुळे ते असे करणे शक्मय नाही असा युक्तिवाद केला जात आहे.
वाजपेयी पंतप्रधान असताना अब्दुल कलाम यांच्यासारखे लोकोत्तर राष्ट्रपती झाले कारण भाजपकडे बहुमत नसल्याने त्याला इतर पक्षांशी बोलणी करावी लागली. सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराला खिजवण्यासाठी आडवाणी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांचे नाव पुढे केले होते. पण मुलायम सिंग यादव यांनी अब्दुल कलाम यांना उमेदवार बनवलेत तरच पाठिंबा मिळेल अशी भूमिका घेत उत्तरप्रदेशातील आपल्या समाजवादी पक्षाची मुस्लिम मतपेढी घट्ट केली. कलाम यांना पाठिंबा देणे काँग्रेसला तेव्हा भाग पडले होते.
या मुद्यावर मोदींच्या मनात काय चालले आहे हे मात्र कोणालाच माहित नाही. ‘मोदी को समझने के लिये मोदी का दिमाग समझना जरुरी है’ असे पंतप्रधानांनीच एकदा सांगितले होते. त्यांनी बिजू जनता दल आणि वाय एस आर काँग्रेस यांच्यासारख्या मित्रपक्षांशी अगोदरच बोलणी केलेली दिसत आहे. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने या न्यायाप्रमाणे सत्ताधारी पक्षाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांचा एक संयुक्त उमेदवार उभा करण्याचा बेत आहे पण त्याबाबत कोणताच गैरभाजप पक्ष जोरदार काम करताना सध्या तरी दिसत नाही. विरोधी पक्षांचे आव्हान सध्या तरी फुसकेच दिसत आहे.
सुनील गाताडे