शेतकरी लागले कामाला : अजूनही दमदार पावसाची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
मान्सूनला सुरुवात झाली असली तरी पहाटे आणि रात्रीच्यावेळी पाऊस पडताना दिसत आहे. दिवसभर मात्र हा पाऊस विश्रांती घेत आहे. सध्या झालेल्या या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱयांनीही विविध कामांना सुरुवात केली असून अजून दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.
यावषी मान्सूनचे उशिराने आगमन झाले. शेतकऱयांनी खरीप पेरणी करून ठेवली होती. मात्र पाऊस नसल्यामुळे पिके धोक्मयात आली होती. गेल्या चार दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाले आहे. अधूनमधून सरी कोसळत आहेत. दिवसभर पावसाची उघडीप राहिली तरी पहाटे मात्र पावसाच्या काही सरी कोसळत आहेत. काहीवेळा रात्रीही पाऊस पडत आहे. पाऊस पडत असला तरी त्याला म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे अजून जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.
सध्या भाताची उगवण बऱयापैकी झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी कोळपणी करण्याच्या कामाला लागला आहे. मान्सून लांबल्यामुळे सोयाबीन आणि भुईमूगची पेरणी खोळंबली होती. मात्र आता शेतकऱयांनी सोयाबीन व भुईमूग पेरणीला सुरुवात केली आहे. सध्या या पिकांना पाऊस पोषक ठरला असला तरी भातरोप लावण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. मोठा पाऊस झाला तरच भात लावणी करणाऱया शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.