वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबोडकरांच्या या सल्लावर अनेक राजकिय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून प्रकाश आंबेडकर कधी कधी चांगला सल्ला देतात असा उरोधीक टोला लगावला होता. त्यानंतर आता रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्याला आपलाही पाठींबा असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसापुर्वी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत बनाव सुरु असल्याचा आरोप करुन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडाव असा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेड कर कधीकधी चांगला सल्ला देतात असे म्हटले होते.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनीही आंबेडकरांच्या या सल्ल्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले कि, “उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं हा सल्ला प्रकाश आंबेडकरांचा चांगला सल्ला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दोस्ती केली होती. ही दोस्ती अजून आहे की नाही याची खात्री नाही. परंतु त्यांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला काहीच हरकत नाही. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते पहावं लागेल. मात्र प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मला योग्य वाटत असून याला माझाही पाठिंबा आहे.”