प्रतिनिधी/सातारा
यंदा पावसाला खुप उशीरा सुरूवात झाली त्यामुळे जिल्हय़ातील जवळपास सर्वच शेतकऱयांच्या पेरण्या रखडल्या होत्या. कृषी विभाने ही पेरण्या न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण जुलै महिन्याच्या सुरूवाती पासुनच दमदार पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी वर्गांनी आपल्या पेरणीच्या कामांनाही जोमाने सुरूवात केली. सध्या जिल्हय़ातील 68.68 टक्के इतके पेरणींचे उद्दिष्ट्य़ पूर्ण झाले आहे. जिल्हय़ातील एकुण 397348 क्षेत्र हेक्टर पैकी 272879 हेक्टर भागात पेरण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सातारा एकुण पिक क्षेत्रात जिल्हय़ात (क्षेत्र हेक्टर) 32593 (63.46 टक्के), जावळी 15650 (82.03 टक्के), पाटण 49901 (78.40टक्के), कराड 51929 (81.20 टक्के), कोरेगाव 19857 (54.16 टक्के), खटाव 27321 (53.71 टक्के), माण 35405 (88.23 टक्के), फलटण 17370 (55.97 टक्के), खंडाळा 8462 (57.35 टक्के), वाई 10757 (50.16 टक्के), महाबळेश्वर 3634 (82.20 टक्के) इतक्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.
एकंदरीत आकडेवारी पाहता सर्वाधिक पेरण्या या माण तालुक्यात झाल्या आहेत. तसेच सर्वात कमी पेरण्या या वाई तालुक्यात झाल्या आहेत. सध्या पाऊस ही बऱयाच प्रमाणात ओसरला असल्याने उर्वरीत पेरण्यांचा टप्पा ही येत्या काही दिवसात पुर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग हे अद्याप ही शेतींच्या कामांमध्ये चांगलेच व्यस्थ आहेत.
जिल्ह्य़ातील खरीप हंगामातील पिकांची आकडेवारी
पिकांची नावे
टक्केवारी
भात
77.14
खरिप ज्वारी
58.36
बाजरी
56.46
नागली
31.04
मका
69.99
इतर तृणधान्य
41.95
तूर
41.95
मुग
93.65
उडीद
62.41
इतर कडधान्य
72.05
भुईमुग
93.45
तीळ
26.67
कारळा
37.77
सुर्यफुल
54.04
सोयाबीन
110.36
इ.गळीतधान्य
71.43
कापूस
514.81
गाळप उ. ऊस
30.4
नवीन ऊस लागवड
68.68