कॉंग्रेसने नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आज पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी मल्लांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
पुढे बोलाताना ते म्हणाले, ” कॉंग्रसने अंतर्गत बसूनच हा विषय हाताळायला हवा होता. बाळासाहेब थोरात टोकाची भुमिका घेत नाहीत. थोरातांनी चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता. अजूनही वाद मिटवून मार्ग निघू शकतो.” असे त्यांनी परखड मत व्यक्त केले. पुण्यात काल संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्पर्धेतील विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्यजित तांबेंची भाजपशी जवळीक होत आहे त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, वेगळा रस्ता धरणारा उमेदवार पक्षाच्या बाहेरचा होता असे होत नाही. लोकांसाठीच्या चळवळीत सत्यजित तांबेंचे अनेक वर्षे काम केले आहे. कॉंग्रसने थोडा सामंजस्य दाखवायला हवा होता. असे ते म्हणाले. सत्यजित तांबेंची भाजपशी जवळीक होत आहे त्यावर शरद पवारांनी बोलण्यास नकार देऊऩ देवेंद्र फडणवीसांच्या कृतीवर भाष्य करायचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून येऊ शकत नसणाऱ्यांचे पुण्यात योगदान काय? कोथरुडमध्ये त्यांचे योगदान काय? ज्यांचे काहीच योगदान नाही त्यांच्यावर काय बोलणार? असे बोलून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
पैलवानांना आणि कुस्ती खेळाडूंना हातभाराची गरज असल्याचे सांगताना शरद पवार म्हणाले, “खाशाबा जाधवनंतर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीच कामगीरी करु शकलो नसल्याची अस्वस्थता आहे. ती दुर करण्यासाठी आपण खेळाडूच्या पाठिशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. हे खेळाडू धनाढ्य कुटुंबातील नसतात. त्यांना खेळासाठी अफाट खर्च करावा लागतो, त्यामुळे सक्षम खेळाडू घडवण्यासाठी त्यांना आर्थिक हातभाराची गरज असते असे मत पवार यांनी व्यक्त केले.