राज्यात राजकीय स्थित्यंतर घडले. शिवसेनेत उभी फुट पडली. सरकार बदलले. त्यामुळे आपले कोण? त्याची व्याख्या बदलली. शिवसेनेत बंडखोरी करणाऱया आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली. बंडखोरांच्या विरोधात सर्वात मोठी लढाई करण्यास आपण सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी या यात्रेतून पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. राजकीय लोकांचे व्यवहार हे आरोप प्रत्यारोपांचे आणि समोरच्याला त्याची जागा दाखवण्याचे असतात. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात यात्रा आणि उत्तर सभा यांचे राजकारण जोरदार घडले.
शनिवारी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा दौरा केला. सकाळी रत्नागिरीत सभा घेतली. बंडखोरी करणाऱया लोकांची आम्ही गय करणार नाही. त्यांच्याविरोधात लढण्यास आम्ही कमी पडणार नाही, असे सांगण्याचा त्यांचा हेतू होता.
आदित्य ठाकरे म्हणाले, चाळीस आमदारांनी शिवसेनेशी जी बंडखोरी केली, त्यांनी योग्य की अयोग्य केलं ते विचारण्यासाठी आपण आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य केले होते. राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू झाल्यानंतर होत असलेली गर्दी पाहून निरोप यायला लागलेत. बंडखोर म्हणू नका. पण 50 खोके प्रत्येक बंडखोराच्या घरात गेलेत…स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके’ असे घाणेरडे राजकारण सुरू आहे. सुमारे 3 महिने झालेत, पण या डबल इंजिनच्या सरकारला एकही आपण काम केल्याचे दाखवू शकले नाहीत, अशी राज्याची स्थिती झाल्याचे ठाकरे यांनी म्हटले. हे सरकार गद्दारांचे, बेईमानांचे, घटनाबाहय़, खंजीर खुपसणारं आहे, हे सिध्द करून दाखवतो. डबल इंजिनचे हे सरकार केंद्राच्या पाठबळावर असून कुठेही महाराष्ट्राच्या जनतेकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. यांनी ठाकरेंचे सरकार पाडले, शिवसेनाप्रमुखाच्या सुपुत्राचे सरकार पाडले, महाविकास आघाडीचे, शेतकऱयांचे कष्टकऱयांचे, महिलांचे, तरूण-तरूणींचे सरकार पाडले ते खोक्यांसाठी पाडल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
विशेष बाब म्हणजे रत्नागिरीचे स्थानिक आमदार उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी असले तरी त्यांच्यावर कोणतीही व्यक्तिगत टीका करण्याचे आदित्य ठाकरे यांनी टाळले. यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सामंत यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्याने गदारोळ झाला होता.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, यापूर्वी मोठय़ा सभा रत्नागिरीत झाल्या आहेत़ मात्र रत्नागिरीत कॉर्नर सभा घेवून आदित्यजींना छेटे करण्याचे काम झाल़े सभेला अन्य ठिकाणाहून गर्दी जमवण्यात आली होत़ी खरे शिवसैनिक हे आपल्यासोबत आहेत, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितल़े
आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, शिवसेनेत आता कोण बोलायला शिल्लक नसल्याने भास्कर जाधव यांना बोलावले जात आह़े दुसऱयांना शिवीगाळ करून स्वतःचा पक्ष मोठा होत नसत़ो दुसऱयांना गद्दार म्हणणाऱयांनी गद्दारीची व्याख्या एकदा स्पष्ट करून सांगितली पाहिज़े लवकरच आपण स्वतःला निष्ठावान म्हणविणाऱयांचा भांडा फोड करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले होते. भास्कर जाधव यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नकला केल्याची आठवण सामंत यांनी करुन दिली.
रत्नागिरी जिह्यातील आणखी एक आमदार योगेश कदम यांनी बंडखोरीत भाग घेतला. यामुळे त्यांच्या मतदारसंघात दापोली येथे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. तेथेही बंडखोरांविरुध्द लढय़ाचा निर्धार व्यक्त केला. त्याला रामदास कदम यांनी चोख प्रत्युत्तर दिले. कदम यांनी उत्तर सभा घेऊन थेट शिवसेना नेतृत्वावर शरसंधान केले. कोकणातील जनता वादळाशी सामना करत असताना उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोकणात आले नाहीत, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या वयात कोकणात आले. मातोश्रीचे दरवाजाचे आता सर्वांसाठी उघडे आहेत तथापि उध्दव ठाकरे
हॉस्पिटलमध्ये असताना तेथे योगेश कदम यांना संपवण्याची मिटींग भरत असे. बाळासाहेबांनी जे कमावलं ते त्यांच्या पुढच्या लोकांनी गमावलं असा घणाघात रामदास कदम यांनी केला. आयुष्यभरात पुन्हा कधीही मातोश्रीची पायरी चढणार नाही असा वज्रनिर्धार कदम यांनी केला.
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून काही कारभार केला. आदित्य ठाकरे यांनी मंत्री म्हणून योगदान दिले. तथापि त्या कालावधीत त्या दोघांपैकी कोणीही कोकणात अनेक प्रश्नांसाठी व्यापक दौरा केला नाही. हा मुद्दा रामदास कदम यांनी आवर्जून उचलला आहे. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी ठाकरे कुटुंबियांना देणे घेणे नाही असा जोरदार प्रहार रामदास कदम यांनी दापोली येथे झालेल्या उत्तर सभेत केला.
सध्या रत्नागिरी जिह्यात बंडखोर विरुध्द शिवसेना नेते यांच्यात जोरदार लढाई सुरु असल्याचे दिसत आहे. आरोप प्रत्यारोप नियमित घडत आहेत. त्यांच्यात प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरोधात कठोर भाषा वापरली म्हणून त्यांचा पुतळा जाळण्याचे काम रत्नागिरीतील शिवसैनिकांनी मंगळवारी केले. आपल्या नेतृत्वापर्यंत निष्ठावानपणा पोहोचवण्यासाठी अशा आंदोलनांचा उपयोग निश्चितपणे होत असतो. मात्र बंडखोर आणि मूळ पक्ष यांच्यातील दुही आपोआपच वाढत असते. सध्या भाजप विरुध्द शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द बंडखोर शिवसेना असे चित्र दिसून येत नाही. सर्वत्र शिवसेना विरुध्द बंडखोर असेच चित्र दिसून येत आहे. आगामी निवडणुकांमध्ये देखील हाच प्रश्न उभा राहणार असल्याचे चित्र आहे.
राजकीय गदारोळात विकास मुद्यांचा प्रश्न कसा मार्गी लागणार हा मोठा मुद्दा आहे. ठिकठिकाणचे रस्ते दुरुस्तीस आले आहेत. शाळा इमारतींची पडझड होत आहे. अनेक ठिकाणी साकवांच्या मागण्या पूर्ण होत नाही. पिण्याच्या पाण्याची कायम व्यवस्था होण्यासाठी शासकीय पातळीवरुन पावले उचलण्यात अडचणी येत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तथापि सत्ता गेल्याने दुःखी बनलेले सेना नेते विकास कामांच्या आधारे शिंदे गटाला †िखंडीत पकडण्याऐवजी राजकीय आवेशाची भाषणे करत आहेत. या आवेशामुळे कदाचित सभा चांगल्या होत असतील पण जनतेचे प्रश्न सुटायला कितपत मदत होणार हा प्रश्न आहे.
सुकांत चक्रदेव