प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर तालुक्यातील इदलहोंड ग्रामपंचायत अखत्यारित येणाऱ्या सिंगिनकोप्प गावातील ग्रामस्थांच्या घरांची नोंद झाली आहे. मात्र संगणक उतारा मिळत नसल्यामुळे सिंगिनकोप्प ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. सिंगिनकोप्प गावातील जवळपास80 हून अधिक कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली. मात्र त्याची संगणकीय नोंद झाली नसल्यामुळे संगणकीय उतारा मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने संगणकीय उतारा मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने संगणकी उतारा देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी सिंगिनकोप्प ग्रामपंचायतीचे अध्यक्ष चांगाप्पा बाचुळकर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.