आज विधानसभा अधिवेशनात रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.
रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले की, रायबाग शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच रायबाग शहरासह चिंचली-कंकणवाडी आणि कब्बूर नगर पंचायतींनाही निधी मंजूर झाला आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी तात्काळ भूमिपूजन करण्याची मागणी केली.
यावेळी नगरविकास मंत्री भैरती बसवराजू यांनी निविदा मागवून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.