कुंपण घातल्याने वाहने पार्किंग करणे बनले अवघड : वाहनधारकांची होतेय मोठी गैरसोय
खानापूर : येथील तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरील बाजूला शिवस्मारक ते स्टेशन रोड या रस्त्यालगत तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे अनेक वाहनधारकांची तसेच पादचाऱयांची गैरसोय होत आहे. या कुंपणामुळे नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात मात्र जुंपली आहे.
नव्याने रुजू झालेले तहसीलदार प्रवीण जैन यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहने पार्किंग करणाऱयावर बंधन आणले. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरील बाजूस तारेचे कुंपण घालून वाहनधारकांना मज्जाव केला आहे. राजा शिवछत्रपती स्मारक ते तीनशे मीटर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे. त्याच्या पुढे नगरपंचायतीचे कार्यालय आहे. शहरात नगरपंचायतीच्या मालमत्ता असल्याने नगरपंचायत याबाबत निर्णय घेते. मात्र, तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी करण्यात आलेल्या कुंपणाबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाबासाहेब माने यांना विचारले असता ते म्हणाले, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीचा असल्याने आम्ही तेथे हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याबाबत बांधकाम खात्याने निर्णय घ्यावयाचा आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता हलगी म्हणाले, हा रस्ता आमच्या मालकीचा असला तरी रस्त्याच्या शेजारी येणाऱया मालमत्ता या नगरपंचायतीच्या आहेत. तसेच मागील वर्षी दवाखान्यालगत असलेली खोकी नगरपंचायतीने कोणत्या आधारे हटविली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी घेतली होती का? त्यामुळे जे तारेचे कुंपण घालण्यात आले आहे, त्याबाबत नगरपंचायतीनेच निर्णय घ्यावयाचा आहे.
नगरपंचायतीचे दुर्लक्ष
दोन्हींकडील दुकानदार आपले सामान बाहेर लावतात. त्यामुळे या रस्त्यावरून सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत पादचाऱयांना चालत जाणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर रिक्षा अथवा चार चाकी वाहन आल्यास अर्धा तास वाहतूक केंडी होते. यासाठी नगरपंचायतीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे नगरपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
याबाबत मुख्याधिकारी माने म्हणाले, सम-विषम पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी पांढरा पट्टा मारण्यात येणार आहे. या पांढऱया पट्टय़ाच्या बाहेर वाहन पार्किंग झाल्यास पोलिसांना याबाबत क्रम घेण्यासाठी सूचना करण्यात येणार आहे.
फुटपाथवर व्यापाऱयांचे अतिक्रमण
शहरात दुचाकींच्या पार्किंगमुळे लक्ष्मी मंदिरापर्यंत चालत जाणेही मुश्कील झाले आहे. राजा शिवछत्रपती स्मारक ते लक्ष्मी मंदिरपर्यंत सम-विषम पार्किंग करण्यात आले आहे. गाडय़ा पार्किंग करताना एका मागोमाग तीन-तीन गाडय़ा पार्किंग केल्या जातात. गेल्या काही महिन्यांपासून नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे व्यापाऱयांचे फावले आहे. व्यापारी आपली दुकाने फुटपाथवरच लावत आहेत. त्यामुळे फुटपाथ पादचाऱयांच्या उपयोगापेक्षा व्यापाऱयांच्या उपयोगाचा ठरला आहे.