काही दिवसापुर्वी रत्नागिरीमध्ये हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशेच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून २५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री मदत निधीतून 10 लाख रुपये आणि इतर योजनातून 15 लाख रुपये दिले जाण्याची मंजूरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची अशी घोषणा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच शशिकांत वारिशे यांच्या मुलालाही शासकिय सेवेत घेणार असल्याचे सांगितले.
कोकणातील वादग्रस्त ग्रीनफिल्ड रिफायनरी प्रकल्पाविरोधात पत्रकार शशिकांत वारीसे लिहल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पंढरीनाथ आंबेकर या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारिसे यांच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून 10 लाख रुपये आणि इतर योजनांकडून 15 लाख रुपये दिले जाणार आहेत.तसेच वारिसे यांच्या मुलाला सरकार नोकरीही देणार आहे.” असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य शासनाने वारीसे यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाला (एसआयटी) निर्देश दिले असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवले जाईल असे घोषित केले आहे.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन