ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हिंमत असेल तर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची अंमलबजावणी थांबवून दाखवा, असं खुलं आव्हान पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) दिलं.
शुभेंदू अधिकारी यांची शनिवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे सभा झाली. या सभेत जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, ठाकूरनगर हे मतुआबहुल क्षेत्र आहे. या समाजाची मुळं बांग्लादेशात आहेत. त्यामुळे या राज्यात आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायद्या लागू करणार आहे. या कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची अंमलबजावणी थांबवून दाखवावी.
अधिक वाचा : निवडणूक ड्युटीवरील CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू
केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी सीएएच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचं आश्वासन दिलं. तसेच काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनचं सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.