पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची सरकारकडे मागणी
प्रतिनिधी /पणजी
म्हादई नदीवरील कर्नाटक राज्यात बांधण्यात येणाऱया कळसा भंडुरा प्रकल्पाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कर्नाटक सरकारने त्याचा प्रकल्प अहवाल तयार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा कर्नाटक सरकार करीत असून प्रकल्पाची सर्व तयारी कर्नाटक सरकारतफ्xढ करण्यात आली आहे. गोवा सरकारने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून तातडीने कृती करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केली आहे.
गेले वर्षभर तरी या विषयाकडे गोवा सरकारचे दुर्लक्ष झाले असून कोणतीच कृती करण्यात आलेली नाही. तसेच पावलेही उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कर्नाटक सरकारचे फ्ढावले असून त्या सरकारला प्रकल्प पुढे नेण्यासाठी जवळपास गोवा सरकारने हिरवा कंदिलच दर्शवला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कळसा भंडुरा प्रकल्प कर्नाटक सरकारने पुढे नेल्यास त्याचे गंभीर परिणाम गोव्यावर होणार असल्याची भीती पूर्वीपासूनच व्यक्त होताना दिसते. परंतु त्याची पर्वा गोवा सरकारला नसल्याचे समोर येत आहे. गोवा- कर्नाटकातील म्हादईचा पाणी वाटपाचा तंटा अजूनही सुटलेला नाही. गोव्यात विधानसभा निवडणूक होऊन पुन्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार सत्तेवर आले. परंतु या सरकारने म्हादईच्या प्रश्नाकडे गेले तीन महिने तरी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न म्हादईच्या पाण्यात तसा भिजत पडल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने या प्रकरणी कृती न केल्यास हात चोळीत बसण्याची पाळी येणार अशी चिन्हे व लक्षणे दिसत आहेत. राजेंद्र केरकर यांनी सरकारचे पुन्हा एकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधले असून कृतीची मागणी केली आहे.