ऑस्ट्रेलिया, मेलबर्न येथे सुरु असलेल्या आय़सीसी वर्ल्ड कपस्पर्धेमध्ये संपुर्ण जगाचे लक्ष असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या हाय होल्टेज सामन्यात भारताने पकिस्तानवर विजय मिळवला आहे. अत्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीमध्ये भारताने पाकिस्तानवर ४ गड्याने विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या तुफान बॅटिंगने टिम इंडियाचा विजय सोपस्कर झाला.
या स्पर्धेत आपल्या पहिल्या सामन्यात पकिस्तान विरूद्ध लढताना भारताने पाकिस्तानला ८ गड्यांच्या बदल्यात १५९ धावांवर रोखले. यामध्ये अर्शदिपने ४ ओव्हरमध्ये ३२ रन देउन ३ विकेट्स घेतले. अर्शदिपने भेदक मारा करत कॅप्टन बाबर आझम (०) आणि महम्मद रिजवान (४) यांना बाद करून झटका दिला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची सुरवात अडखळत झाली. सुरवातीचे फलंदाज स्वस्तात गेल्याने कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी भारताची धावसंख्या सावरली. १६० धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. विराट कोहलीने नाबाद ८२ धावा करून सामन्याच्या शेवट्या चेंडूपर्यंत लढत दिली आणि विजय खेचून आणला.