शासनाच्या विविध योजना शेतकऱयांपर्यंत पोहोचविणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी क्षेत्र बळकट झाले तरच देशाचा विकास होईल. यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱयांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे मत ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
देवराज अर्स मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे गंगा कल्याण योजनेंतर्गत शेतकऱयांना विविध अवजारांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हेब्बाळकर बोलत होत्या.
नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक
कृषी क्षेत्राचा विकास करायचा असल्यास नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. देशाचा विकास व्हायचा असल्यास कृषी क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण मतदार संघातील 19 लाभार्थी शेतकऱयांना मोटारपंप, पाईप, इलेक्ट्रॉनिक बॉक्स आणि बोअरवेलसंबंधी साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा काँग्रेस प्रमुख मृणाल हेब्बाळकर यासह शेतकरी उपस्थित होते.