निलजीपासून हुदलीपर्यंत होणार खोदाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाला हा शेतकऱयांना शापीतच ठरला आहे. हा नाला म्हणजे दरवषी शेतीचे नुकसान करणारा बनला आहे. हा नाला पूर्णपणे बुजून गेला आहे. आता उद्योग खात्री योजनेतून निलजीपासून हुदलीपर्यंत काम केले जाणार आहे. मात्र येळ्ळूरपासून निलजीपर्यंत नाल्याच्या कामाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे या नाल्याचे काम पूर्ण होणार की पुन्हा अर्धवट राहणार, हे आता पहावे लागणार आहे.
बळ्ळारी नाला हा येळ्ळूरच्या शिवारापासून सुरू होतो. येळ्ळूर, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, बसवणकुडची या गावांच्या शिवारातून निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री बी. के., बाळेकुंद्री के. एच., सुळेभावी, तुम्मरगुद्दी, हुदली असा जातो. उद्योग खात्री योजनेमधून या नाल्याची खोदाई करण्यासाठी तालुका पंचायतीने आराखडा तयार केला आहे. ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱया नाल्याची खोदाई करणार असल्याचे तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी सांगितले.
बळ्ळारी नाल्याला डेनेजमिश्रित पाणी सोडले गेले आहे. या नाल्यामध्ये कचरा टाकण्यात येत आहे. दरवषी हजारो एकरमधील भातपीक खराब होत आहे. येळ्ळूरपासून सुरू झालेल्या नाल्यामध्ये झाडे, झुडुपे, जलपर्णी वाढली आहे. आता त्यामध्ये अनगोळ, भाग्यनगर, वडगाव परिसरातील डेनेजचे पाणी उघडय़ावरच सोडण्यात आले आहे. त्यामुळे शिवारात शेतकऱयांना काम करणेदेखील कठीण झाले आहे. इतकी गंभीर बाब असताना त्याकडे अधिकारी किंवा इतर लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
निलजीपासून हुदलीपर्यंत या नाल्याचे काम करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. निलजी 1.46 कि.मी., मुतगा 3.59 कि.मी., सांबरा 2.42 कि.मी., बाळेकुंद्री बी. के. 0.82 कि.मी., बाळेकुंद्री के. एच. 2.98 कि.मी., सुळेभावी 7.38 कि.मी., तुम्मरगुद्दी 3.71 कि.मी., हुदली 7.09 कि.मी. अंतर खोदाई करण्यात येणार आहे. संबंधित ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱया नाल्याचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
उद्योग खात्री योजनेतून नाल्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम तडीस नेणे गरजेचे आहे. केवळ निलजीपासून हुदलीपर्यंत काम करून उपयोग होणार नाही तर पश्चिमेकडील असलेल्या सर्व गावांपर्यंत या नाल्याची खोदाई होणे महत्त्वाचे आहे. सर्वात म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर या नाल्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठी जे बॉक्स तयार करण्यात आले आहेत, ते बॉक्स खुले करणे तसेच पर्यायी पुलाची उभारणी करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा केवळ शिवारच नाही तर बेळगाव शहरालाही महापूरचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
उद्योग खात्री योजनेमध्ये ग्राम पंचायतीच्या माध्यमातून हे काम होत आहे. आता या नाल्याचा बराच भाग महापालिकेच्या अखत्यारित येतो. त्यामुळे महापालिकेनेही एखाद्या योजनेमध्ये त्याची खोदाई करावी, अशी मागणी होत आहे. येळ्ळूर रस्त्यापासून बसवणकुडचीपर्यंत महापालिकेच्या हद्दीमध्ये हा नाला येतो. त्यामुळे उद्योग खात्री योजनेंतर्गत ग्राम पंचायती काम करत आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांनीही काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.