पुणे / प्रतिनिधी :
राज्यात थंडीचा जोर वाढला असून, हंगामात पहिल्यांदाच किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला आहे. राज्यात जळगावात शुक्रवारी तापमान 10.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे.
उत्तरेकडील राज्यात हिमवर्षाव तसेच पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच वायव्य भारत तसेच मध्य प्रदेशातील किमान तापमानही घटले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाल्याने राज्यातही गारठा वाढला आहे. राज्यातही हवामानही कोरडे असल्याने बोचरी थंडी जाणवत आहे. शुक्रवारी राज्याच्या अनेक भागात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. यात मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तापमानात घट झाली आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
अधिक वाचा : पुणे विमानतळावर 5G प्लस सेवा सुरू
राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे :
अंश सेल्सिअसमध्ये कुलाबा 23.2, सांताक्रूझ 22.2, रत्नागिरी 20.1, डहाणू 18.9, पुणे 11.2, लोहगांव 14, नगर 11.4, कोल्हापूर 17, महाबळेश्वर 12, नाशिक 11.2, सांगली 15.5, सातारा 15.2, सोलापूर 16.2, औरंगाबाद 11.4, परभणी 14.6, नांदेड 16, अकोला 14.8, गोंदिया 14.4, नागपूर 14.1.