राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी हे तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी व पर्यटन स्थळे विकसित व्हावी, विविध विकास कामे व्हावीत या मागणीसाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील राधानगरी येथील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन राधानगरी शहराला नगरपंचायत व्हावी यासाठी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच राधानगरी शहराला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त करून दिला जाईल व विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
यावेळी गोकुळ दूधसंघाचे संचालक अभिजीत तायशेटे, दिपक शेट्टी, माजी सरपंच विजय ढेरे, यांच्यासह राधानगरीतील शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते