जत / प्रतिनिधी
जत शहरातील घाडगेवाडी रोडवरील पाटील मळा येथे गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास विजेची तार तुटून दोन तरुणांच्या अंगावर पडल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
जत घाडगेवाडी रस्त्यावर पाटील वस्ती येथे गुरुवारी सायंकाळी तरुण शेतकरी रोहित अजित पाटील वय 16 व शिवाजी पांडुरंग महारनुर वय 26 हे शेतीत रास करत होते. याचवेळी शेतातून गेलेली 11 केव्ही विजेची मेन लाईन तुटून रोहित पाटील यांच्या अंगावर पडली. त्याला बाजूला करत असताना त्याचा दुसरा मित्र शिवाजी महारणुर यालाही विजेचा जोरदार झटका बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तसेच रोहित याच्या आईला देखील त्यांना वाचवताना दुखापत झाली आहे.