ओटवणे प्रतिनिधी
Vishakha Palav stood first and Sushma Manjrekar stood second in the state level essay competition
महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाच्यावतीने मराठी विषयाच्या शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सौ विशाखा विश्राम पालव (सिंधुदुर्ग) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विभागून सुषमा प्रवीण मांजरेकर (सिंधुदुर्ग) आणि अनिता नगराळे (यवतमाळ) यांनी तर तृतीय क्रमांक विभागून मृणाल इंदप (मुंबई) आणि सुरेखा कांबळे (सांगली) यांनी पटकाविला.
या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे चौथा क्रमांक विभागून जयश्री पिंगळे (कोल्हापूर) आणि डॉ देविदास गुरव (सोलापूर), पाचवा क्रमांक सुधाकर थुरंगे (लातूर), सहावा क्रमांक लक्ष्मण माळी (सोलापूर), सातवा क्रमांक विभागून अंजना शिंदे (सातारा) अवधूत तेरखेडा (उस्मानाबाद), आठवा क्रमांक रोहिणी महाबळेश्वर (सातारा), नववा क्रमांक शर्वरी वैद्य (नागपूर) आणि प्रांजली कुलकर्णी (सातारा), दहावा क्रमांक विभागून साक्षी नलावडे (रत्नागिरी) आणि घनश्याम देवचंद पटले (गोंदिया), अकरावा क्रमांक सोपान कलांल (उस्मानाबाद)
या स्पर्धेत दिव्यांग शिक्षकांसाठीच्या ज्ञानानंद निबंध पुरस्कारासाठी रजनी शर्मा (राजुरा चंद्रपूर) यांची निवड करण्यात आली. या निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा मोरे (सातारा) आणि भरत गावडे (सिंधुदुर्ग) यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ७ व ८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात
होणाऱ्या मराठी विषय शिक्षकांच्या ४० साव्या राज्यस्तरीय कृती सत्रात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि ना लांडगे आणि कार्याध्यक्ष भरत गावडे यांनी केले आहे.