ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डॉ. रणजितसिंह डिसले यांच्यासह ५३ यशस्वीतांचा सन्मान,’वारणाई’ सुवर्ण ऋण
योजनेचे उद्घाटन
वारणानगर / प्रतिनिधी
भारत सरकार यांच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता (एस.एस.एस.ई.) मंत्रालयाच्या विविध योजनातील वारणा समूहाचे प्रमुख आ.डॉ. विनय कोरे यानी मागणी केलेल्या नऊ योजनेचे प्रस्ताव पाठवले असतील व यामध्ये तांत्रीक अडचणी नसतीलतर अशा नऊ योजनेला मंजूरी दिल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता खात्याचे मंत्री ना. नारायण राणे यानी केली.
वारणानगर ता.पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित, डॉ. विनय कोरे (सावकर) गौरव प्रतिष्ठान आणि श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुहाच्या अंतर्गत श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, आयोजीत गुणवंत गौरव व उद्घाटन सोहळा-२०२३ च्या कार्यक्रमात ना.राणे यानी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यानी विविध योजनांच्या मंजूरीची घोषणा केली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वारणा समूहाचे प्रमुख आ.डॉ. विनय कोरे होते.
ना. राणे यानी अस्पायर प्रमोशन ऑफ इनोव्हशन, ग्रामीण उद्योग आणि उद्योजकच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारी योजना, एम.एस.एम.ई. एच. आय.बी. आय. चॅम्पीयन हि योजना नवसंशोधकांना नाविण्यपुर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठी असणारी योजना,प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम,वारणा परिसरामध्ये कार्यरत असणा-या सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडीट गॅरंटी योजना, सुक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम,उद्योजकता स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम..
प्रोक्युरमेंट आणि मार्केटींग सपोर्ट (पीएमसी) च्या माध्यमातून वारणानगर येथे आयोजित केलेल्या विविध प्रदर्शन, सेमिनार, वर्कशॉप यांच्यासाठी मदत, नॅशनल एस.सी. एस.टी. हब चे कार्यालय,खादी ग्रामोद्योग योजना खादी विकास आणि खादी ग्रामोद्योग विकास योजना अशा नऊ योजना वारणा संकुलात सुरू करण्यासाठी मंजूरीची घोषणा केली.
वारणा शिक्षण संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘ स्किल इंडिया उपक्रम ‘ राबवणाऱ्या विश्वविलास स्कूल ऑफ एक्सलन्सचे व विलासराव कोरे तारांगण सेंटरचे उद्घाटन मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ.विनय कोरे, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निलमताई राणे, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
विनय कोरे चागले मित्र आहेत त्यांच्या आग्रहाखातर आजारी असताना देखील या कार्यक्रमास उपस्थित राहिलो परंतु समाजाच्या विकासाचा ध्यास ठेवून कार्य करणारे विनय कोरे यांच्या सारखी दुर्मिळ उदाहरणे या देशात आहेत असे ना. नारायण राणे यानी सांगून मी मार्गदर्शन करायला आलेलो नाही आपनाशी संवाद साधायला हितगुज करायला आलो आहे मिडीया व माध्यम कोणत्या जागी कोणते प्रश्न उपस्थित करावेत कोण कोणावर टिका करतोय त्पासाठी कोणाची प्रतिक्रिया घ्यावी कोणाला प्रश्न विचारावेत याचे भान देखील हरपत चालले आहे राजकीय परस्थिती त्यापेक्षा वाईट होत चालली आहे याची खंत व्यक्त करून अडीच वर्षात तीन तास मंत्रालयात आलेल्या माजी मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राचा विकास खुंटला एक कायम बारामतीत व एक मातोश्रीवर म्हणत उध्दव ठाकरे, अजित पवार यांचा थोडक्यात समाचार राणे यानी घेवून मी शिवसैनिक झाल्यापासून मला मिळालेल्या प्रत्येक संधीतून जनतेच्या हितासाठी काम केल्याचे सांगीतले.
पंतप्रधान नरेद्र मोदी यानी सत्ता घेताना १० व्या स्थानावर असणारी अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली ती पहिल्या दोन तीन स्थानावर आणायची आहे महाराष्ट्रात कुशल कारागीरांचा स्थर वाढला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रातला उद्योग वाढला पाहिजे यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज असून इतर प्रगत देशाच्या तुलनेत आपल्या देशातील प्रती मानसी वार्षिक डरडोई उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न केल्यास आपण प्रगत राष्ट्र होणार आहे यासाठी उद्योग उभारा त्यास लागेल ती मदत करू माझेकडे असणाऱ्या खात्याकडे छोटे आणि मध्यम लाखो उद्योग सुरु आहेत त्यामध्ये ११ कोटी कर्मचारी काम करीत आहेत यामध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे ना. राणे यानी यावेळी संगीतले.
देश आर्थिक महासत्ता बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरतेसाठी युवकांनी कष्ट, परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगून परदेशातील विद्यापीठे देशात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.वारणा हे महाराष्ट्राचे विकासाचे केंद्र असून डॉ.विनय कोरे यांनी सर्व क्षेत्रातील उपक्रम यशस्वी राबविले आहेत असे गौरवोद्गार काढून महाराष्ट्रातील किती आमदार,खासदार असे उपक्रम राबवितात असा सवाल उपस्थित करून विनय कोरे यांच्यासारख्या नेतृत्वाला विधानसभेत बिनविरोध पाठविण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले मंत्री राणे यांनी वारणा शिक्षण संकुलातील टेक्नीकल सेंटरला २० कोटी रूपयांची मदत जाहीर करून डॉ.कोरे यांनी मागणी केलेल्या सर्व योजना या वर्षभरात पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
वारणा समुहाचे प्रमुख आ.डॉ विनय कोरे यानी स्वागत करून पुरस्कार प्राप्त शिक्षक, स्पर्धा परिक्षेतून केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत सहभागी झालेले अधिकारी व ग्लोबल टिचर विजेते रणजीत डिसले यांच्या कार्याचा, समूहातील संस्थाच्या प्रगतीचा आढावा घेत केंद्राच्या विविध योजना वारणा समुहात सुरु कराव्यात अशी मागणी प्रास्ताविकात करीत ना. राणेच्या राजकीय व कौटौबिक प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
जी २० जशी जागतिक परिषद आहे त्या धर्तीवर शैक्षणिक जागतिक परिषद व्हावी, आतंरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आदान प्रदान व्हावे, सद्याच्या शिक्षणातील मागील शतकातील इतिहास अभ्यासक्रम बदलून आजच्या युगाला आवशक असणाऱ्या उद्योग व्यवसायाची जोड देणारी शिक्षण पद्धत सुरू करावी तसा अभ्यासक्रमात बदल केला पाहीजे असे मत ग्लोबल टिचर जागतीक विजेते गौरवमुर्ती रणजितसिंह डिसले यानी व्यक्त केले. यावेळी गौरवमुर्ती तानाजी रामचंद्र वाघमोडे विद्यामंदिर, मालाईवाडी, ता. शाहुवाडी,
अकौंटंट असिस्टंट, भारतीय रेल्वेचे अक्षय अशोक संकपाळ, रा. पोखले, ता. पन्हाळा यानी आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी ना. राणे यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ व छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती देवून आ. कोरे यांच्या हस्ते तर सौ. निलम राणे यांचा सावित्री महिला औद्यौगिक संस्थेच्या अध्यक्ष सौ. शुभलक्ष्मी कोरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शोभाताई कोरे वारणा महिला पत संस्थेच्या ‘वारणाई’ सुवर्ण ऋण योजनेचे उद्घाटन सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सौ. निलम राणे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून करण्यात आले.
विनय कोरे आदर्श शिक्षक भूषण पुरस्कार व मानपत्र बार्शी जि. सोलापूर येथील ग्लोबल टिचरचे जागतिक विजेते यांच्यासह वारणेच्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना तसेच स्पर्धा परिक्षातून केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत निवड झालेल्या अधिकारी यांचा व शिष्यवृत्ती परिक्षेत व दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी या गुणवंताचा सत्कार ना. राणे व सौ. निलम राणे यांच्या हस्ते करण्यात आला.मानपत्राचे वाचन प्रा.जीवनकुमार शिंदे यानी केले. प्रा. नरेद्र शिंदे यानी सूत्रसंचलन केले.आभार प्रा. नामदेव चोपडे यानी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर.जाधव, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोकराव माने.जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यस समित कदम, सुशांत फडणीस, अजिंक्य पाटील, प्राचार्य डॉ.एस. व्ही. आणेकर, प्राचार्य जाॅन डिसोझा, प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर यांच्यासह वारणा समूहातील व परिसरातील सर्व संस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक,संचालक, व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, शिक्षण संकुलातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.