बेळगाव शहरात पाणी टंचाईमुळे या उन्हाळ्यात हाहाकार माजला आहे. वडगांव आनंद नगर येथे पेयजलाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने, रस्त्यावर पाणी साचून हजारो गॅलन पाणी अपव्यय होत आहे.
इतकेच नाही तर या परिसरात चिखलमय वातारण निर्माण झाल्याने येथील नागरिक जल मंडळाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात तीव्र असमाधान व्यक्त करीत आहेत. गेल्या काही महिन्यात या भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील नागरिकांचे हाल झाले आहे.
पिण्यासाठी पाणी नसल्याने येथील नागरिकांना स्वखर्चातून टँकर मागवावे लागते मात्र अशा गळतीमुळे पिण्याच्या पाण्याचे अपव्यय होत असून संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.