हिवाळ्याच्या दिवसात पाणी खूप कमी प्रमाणात पिले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक रोगांना फुकटच आमंत्रण मिळू शकते. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. हिवाळ्यात, जर योग्य फळांचे सेवन केले तर तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणती फळे खावीत.
सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात असतो. रोज सफरचंद खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
थंडीच्या दिवसात तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातीलरक्त वाढते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाब, हृदय, वजन कमी आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
थंडीमुळे अनेकजण पेरू खात नसले तरी. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. दुपारच्या वेळेत तुम्ही पेरू खाऊ शकता.
संत्रे हे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. संत्री खावीत.संत्रे शरीर आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते
हिवाळ्याच्या दिवसात संत्रे आणि मोसंबी हि फळे सहज उपलब्ध होतात. यामध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते .
टीप – हंगामानुसार कोणताही आहार सेवन करताना किंवा आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Trending
- कोल्हापुरातील दगडफेकीचा ग्रामीण भागात निषेध; गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा आणि सांगरूळात कडकडीत बंद
- ‘बिद्री’वर प्रशासक आणणार नसल्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही
- जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका घटनेनुसार
- शहरातील परिस्थिती नियंत्रणात : शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
- कोल्हापुरातील दगडफेकीवरून वातावरण तापलं ; विरोधीपक्षातील ‘त्या’ नेत्याच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांचा घणाघात
- कोल्हापुरातील दंगलीचा पालकमंत्री घेणारा आढावा, पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
- ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात!
- मंगाई देवीची यात्रा ११ जुलै रोजी