आमदार शिवेंद्रराजेंचा थेट आरोप ; खासदार उदयनराजेंच्या श्रेयवादावर घेतली फिरकी
प्रतिनिधी/ सातारा
भुयारी गटर असेल, घरकुल असेल सगळया योजना अपूर्णच आहेत. कामाचे नियोजन काहीच नाही. नुसत्या घोषणा जाहीर करायच्या अन् पैसे खाण्याचे धंदे आहेत. सातारा विकास आघाडीचे नेते, त्यांचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी यांचे लक्ष एवढेच होते की मला किती मिळतेय. हे काम आले की या कामातून मला काय मिळतेय, माझी टक्केवारी दिल्याशिवाय काम सुरु करायचे नाही असा सगळा यांचा धंदा सुरु आहे. तसेच भुयारी गटर योजनेत पांढरा हत्ती पोसण्याचे काम केले आहे. त्यामुळे सगळय़ा योजनांचा बोजवारा उडालेला आहे, असा घणाघाती थेट आरोप आमदार शिवेंद्रराजेंनी सातारा विकास आघाडी व खासदार उदयनराजेंच्यावर केला. दरम्यान, त्यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावरुन खासदार उदयनराजेंच्या श्रेयवादावरही त्यांनी टीप्पणी केली.
सुरुची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, राजू गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोरोना काळात जंबो कोव्हिड सेंटर सुरु केले होते. त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता. आतली मशिनरी काय आहे ती जिल्हाधिकाऱयांच्याशी बोलून आपल्याला हलवावी लागेल. व्हेंटीलेटर वैगेरे आता सुद्धा उपयोगी पडणार आहे. भुयारी गटार योजना नेमकी पूर्ण कधी होणार, या योजनेची आजची परिस्थिती काय हे कोणच सांगू शकणार नाही. आज आपण सगळीकडे बघतो कॉन्ट्रक्टर जो आहे तो सगळीकडे रस्ते खोदून टाकतो आहे. प्रतापगंज पेठेतला रस्ता तर चार महिने खोदला आहे. अजूनपण त्या रस्त्याचे काम सुरु आहे. ही कामे सातारा विकास आघाडीने गडबडीने मर्जीतल्या ठेकेदारांना दिली. त्यांच्याकडून जे काय मिळाले असेल ते घेतले आहे. त्यामुळे त्यांचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी, नगरसेवक हे काय आता बोलू शकत नाहीत. ठेकेदाराने ज्याच्या त्याचा हिशोब भागवला आहे अशी चर्चा आहे. खरे म्हणजे सीओंनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. वाढेफाटाच्या इकडे जागा घेवून इसटीपी प्लॉन्ट करुन पाणी शुद्धीकरण करुन सोडून द्यायचे असे होते.
आम्हीमध्ये पाईपलाईनच्या डायमीटरवर बोललो तर छोटय़ा डायमीटरच्या पायपा कशा घालता आहे. तर त्यांचे म्हणण असे येत की जेवढय़ा छोटय़ा पाईपा घालू तेवढय़ा जोराने पाणी जाणार हे दुर्दैव आहे. ही योजना म्हणजे सातारा नगरपालिकेच्या गळय़ातील पांढरा हत्ती आहे. घरकुल योजनेचा बोजवारा उडाला आहे. बायोमायनिंगचे पण तसेच आहे. फक्त काय टेंडर काढा टक्केवारी घ्या याच्या पालिकडे सगळी कामे अर्धवट आहेत. कुठलेही कामाचा फायदा सातारकरांना होत नाही. नुसते सातारा विकास आघाडीचे नेते आणि त्यांचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी यांचे लक्ष एवढेच होते की मला किती मिळतयं. काम आले की त्या कामातून काय मिळतय, यामुळेच बोजवारा योजनांचा उडाला आहे असा आरोप करत 10 ते 20 टक्के काम झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
उदयनराजेंची घेतली फिरकी
राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, राज्यपालांबाबत मी मागेच सांगितले होते. राज्यपाल कोशारी यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे नक्कीच योग्य वेळी भूमिका घेतील. सगळया महाराष्ट्रातल्या जनतेचा भावना जाणणारा नेता आहे. राज्यपाल बदलण्यासाटी प्रक्रिया असते. शिपायी बदलायचा म्हणल तरी एका दिवसात होत नसते. हा तर राज्यपालांचा विषय होता. उदयनराजेंनी लढा केला तर लढाई आज आणि दोन महिन्यानंतर यश आले, त्यावेळी उदयनराजे दिल्लीत मोदींजींना भेटले. त्यावेळी त्यांचेच ववतव्य होते. पहा. पूर्वी छत्रपतींची लढाई विजय मिळेल तेव्हाच संपायची. असे काही शिवाजी महाराज म्हणायचे नाहीत की आता लढाई करुन आलोय चार महिन्यांनी निकाल मिळेल. ज्यांने त्याने उठायचे आणि म्हणायचे माझ्यामुळे झाले. करणारे दुसरीच आहेत. क्रेडीट फक्त घ्यायचे, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंची फिरकी घेतली.
अजिंक्यताऱयाचा प्रश्न मार्गी लागेल
अजिंक्यताऱयाच्या रस्त्याचा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, अजिंक्यताऱयाचा रस्ता मंजूर केलेला आहे. डीपीसीतून मंजूरी मिळवली आहे. प्रतापगडाप्रमाणे आराखडा करण्यात आला आहे. परवा उपमुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन मिटींग घेतली. त्यात माझी सुचना होती की गडावर ज्या जुन्या इमारतांचे अवशेष आहेत. राजसदर आहे. याची माहिती दिली गेली पाहिजे. आपला इतिहास पडलेला दाखवयाचा नको. त्यांचे नुतनीकरण करुन दाखवायला हवे. सातारा म्हणल की शाहु महाराज. शाहु महाराजांची माहिती तेथे द्यावी. त्यांच्या कामाची माहिती द्यावी. त्या पद्धतीने करावे माझी सुचना आहे. तसेच थोडेसे वॉकींग ट्रक करावा. बसायला बेंच. लाईट. झाली पाहिजे. 100 कोटीमध्ये हे सर्व होईल, असे सांगत रोप वे झाला तर चांगला आहे व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
एसपी साहेबांनी कणखर भूमिका घ्यावी
पाठीमागे घडलेले गुन्हेगारीच्या घटनांना कुठेही राजकीय पाठींबा नव्हता. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत आणून दहशत माजवण्याचा गँगवाल्यांचा प्रयत्न आहे. अल्पवयीन मुलांना समज कमी असते. सोशल मीडियावर आपण बघतोच. रिल्सही पाहतोच. पोलीस प्रशासनाने हे खंबीर आहे. असले काही प्रकार झाले तर मोडून काढू शकते हे सातारा पोलिसांनी दाखवले पाहिजे. त्यावेळचे एसपी अभिनव देशमुख यांनी प्रतापसिंहनगर येथील बिल्डारांना खडणी मागण्याचे प्रकार सुमोटो गुन्हे दाखल करुन मोडीत काढले. सध्याचे एसपी पुर्वी साताऱयात होते. त्यांना सातारा माहिती आहे. जिह्यात त्यांनी कणखर भूमिका घेतली पाहिजे. गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी आम्ही पोलीस दलासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले.