प्रा. आर. एस.चोपडे, अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेची ऑनलाईन व्याख्यानमाला
वार्ताहर/ म्हसवड
आपण दैनंदिन जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारची कर्मे करीत असतो. ही कर्मे करीत असताना व्यक्तीने सुखाचा विचार न करता सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून समाजहिताची कामे करणे काळाची गरज असल्याचे मत महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन व जीवन विद्या मिशन सांगलीचे ख्यातनाम व्याख्याते प्रा. आर. एस. चोपडे यांनी व्यक्त केले.
ते महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीने आपल्या संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर सर्व सेवकासाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेतील 65 वे पुष्ष गुंफून ‘ज्ञान हाच देव-2’ या विषयावर मार्गदर्शनपर बोलत होते. अहिल्यादेवी शिक्षण संस्थेने आपल्या सेवकांची मानसिकता सकारात्मक दृढ करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळेच, शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी महिन्यातील पहिल्या व तिस्रया शनिवारी ऑनलाईन व्याख्यान मालिकीचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यान मालिकेतील 65 वे पुष्ष सांगली जीवनविद्या मिशनचे ख्यातनाम व्याख्याते व महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन आर. एस. चोपडे यांनी गुंफले.
पुढे बोलताना प्रा. चोपडे म्हणाले, निसर्गातील सर्वच गोष्टी परमेश्वराचे रुप आहेत. व्यवस्था रूपात परमेश्वर दडलेला आहे हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. शुद्ध ज्ञान हे जीवन विद्येतून मिळत असल्याने जीवन विद्येचे ज्ञान समाजाला दिशादर्शक ठरत असल्याने सर्वांनी ते ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. तुलनात्मक विचार व द्वेष, मत्सर या पासून दूर राहणे गरजेचं आहे. शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ कर्म, शुभ बोलणे, शुभ आचरण याच गोष्टी माणसाला जीवनात यशस्वी व समाधानी करतात हे आपण विसरता कामा नये. त्याचबरोबर ज्या गोष्टींतून दुस्रयाला त्रास होईल व आपल्याला फायदा होईल, अशा गोष्टी टाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रा.चोपडे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक व्यक्तीने नेहमी चांगल्या गोष्टीचे चिंतन करणे अत्यावश्यक आहे. कारण स्थिर मन हेच सुखाचा सागर असून, अस्थिर मन हे दुखाचे मूळ आहे. मनातील अंहकार हा नेहमी सुखाच्या आड येत असतो. त्यामुळे उत्तराला प्रत्युत्तर देणे टाळणे महत्त्वाचे आहे, हे टाळले तर वाद आपोआपच नाहीसे होतील, असा विश्वास शेवटी प्रा.आर.एस.चोपडे यांनी व्यक्त केला.
हे व्याख्यान फ्री कॉन्फरन्स कॉल ऑपवरून ऑनलाईन घेण्यात आले. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारीसह संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संचालक प्रशांत स्वामी यांनी केले.
‘जवळ असणाऱया गोष्टींचा आनंद घ्या’
माणसाने नेहमी आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी आणि नाही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जीवनात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे विसरता कामा नये.जीवनात पैसे आवश्य कमवा पण तो मार्ग प्रामाणिक असणे आवश्यक असल्याच्या भावना प्रा. चोपडे यांनी व्यक्त केल्या.