ऑनलाईन टिम / मुंबई
ईडीने ( ED ) एजीएल ( AGL ) या कंपनीतील गैरव्यवहारासंदर्भात कॉंग्रेसच्या काही नेत्यांची तसेच राहूल गांधी (Rhul Gandhi ) आणि अध्यक्षा सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) यांची चौकशी केली जात आहे. या चौकशी विरोधात कॉंग्रेस पक्षाने संपुर्ण देशाला वेठीस धरले आहे असा आरोप भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis ) यांनी केला.
मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर आरोप केले. “AGL ही कंपनी अनेक स्वातंत्र्यसेनानी व्यक्तींनी स्थपन केली होती. 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांची 2 हजार कोटी रूपयांची ही कंपनी गांधी कुटुंबाने हडप केली.” असा आरोप करताना “कॉंग्रेस पक्षाने आणि गांधी कुटुंबाने ईडीच्या चौकशीला सहकार्य करावे, तसेच यासाठी संपुर्ण देशाला वेठीस धरू नये” असे सांगितले.