भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून दिसून येणाऱया चढउतारांनी गतसप्ताहात तीव्र रुप धारण केले. चार दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी बाजाराने पुन्हा वरचा रस्ता पकडला, पण सप्ताहाचा लसावि नुकसानीचा होता. चालू आठवडय़ातच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडेपर्यंत आणि भारत-चीन संघर्ष शमेपर्यंत हा आशा-निराशेचा खेळ असाच कायम राहणार आहे. अशावेळी जास्त आशावादी न राहणे हाच मंत्र जोपासणे फायदेशीर ठरणारे आहे.
गतसप्ताह भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरला. मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या विक्रीच्या सपाटय़ामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी सेन्सेक्मसने 835 अंशांची उसळी घेत 37,388 ची पातळी गाठल्याने आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 244 अंकांनी वाढून 11,050 वर बंद झाल्याने गुंतवणूकदारांचा अर्ध्याहून अधिक तोटा भरुन निघाला. शुक्रवारी झालेल्या जोरदार खरेदीमुळे सर्वच क्षेत्रांचे समभाग वधारलेले दिसले. बजाज फिनसर्व्ह, एचसीएल, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एल अँड टी, टीसीएस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट, स्टेट बँक आदी कंपन्यांच्या समभागांत 6 टक्क्मयांपर्यंत वृद्धी दिसून आली. तर ग्लेनमार्क (6.21 टक्के ), जीएमआर इन्फ्रा (11.11 टक्के), अशोक लेलँड (13.20 टक्के), एनबीसीसी (7.22 टक्के), आयडीया (13.19 टक्के), इंडिया बुल्स (8.70 टक्के), जिंदाल स्टील (7.10 टक्के) आदी कंपन्यांचे समभाग सहा टक्क्मयांहून अधिक वधारले. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेसाठी दुसऱया पॅकेजची आवश्यकता व्यक्त केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून त्यास सकारात्मक संकेत मिळाल्याने शुक्रवारी जागतिक बाजारात आणि पर्यायाने भारतीय बाजारात तेजीचा माहोल दिसला.
गतआठवडय़ात गुरुवारपर्यंत डॉलरची मजबुती, सोने आणि क्रूड ऑईलच्या किमतीतील घसरण, काही विदेशी बँकांवर निधी हस्तांतरणाच्या बेकायदेशीर व्यवहारांबाबतचे आरोप, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबतची साशंकता, युरोपसह काही देशांत आलेली कोरोनाची दुसरी लाट व त्यासाठीच्या लॉकडाऊन-2 ची घोषणा आणि सप्टेंबर महिन्यातील वायदा सौद्यांची पूर्तता या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळे जागतिक बाजारांपाठोपाठ भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण झाली. गुरुवारी 1100 अंशांनी कोसळलेला सेन्सेक्स व निफ्टी सप्ताहअखेरीस वधारल्याने गुंतवणूकदारांना हायसे वाटले. बाजारात विक्रीचा सपाटा आणि पडझड सुरु असतानाही रुट मोबाईल, कॅम्स व केमकॉन केमिकल्सच्या आयपीओंना तुफान प्रतिसाद मिळाल्याने बाजारात तरलतेची कमतरता नाही, हे स्पष्ट आहे.
चालू आठवडय़ातच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडेपर्यंत आणि भारत-चीन संघर्ष शमेपर्यंत हा आशा-निराशेचा खेळ असाच कायम राहणार आहे. अशा वेळी जास्त आशावादी न राहणे हाच मंत्र जोपासणे फायदेशीर ठरणारे आहे. असे असले तरी या आठवडय़ामध्ये काही घटनांचा सकारात्मक परिणाम बाजारात दिसून येऊ शकतो. भारत सरकारकडून फिस्कल स्टिम्युलस पॅकेज जाहीर करण्याची तयारी सध्या सुरु आहे. हे पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि गरीब कल्याण योजनेच्या निधीपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. या पॅकेजविषयीचे अंदाज लक्षात घेता कृषी, बांधकाम, ग्राहकाधारित कंपन्या, वाहन उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱया कंपन्यांचे समभाग येत्या काळात वधारु शकतात. याखेरीज संसदेच्या अधिवेशनात मंजूर झालेल्या बँकिंग सुधारणा विधेयक, कामगार सुधारणा विधेयकांचे पडसादही बाजारात दिसून येतील. दूरसंचार कंपनी व्होडाफोन ग्रुप पीएलसीने आंतरराष्ट्रीय लवादामध्ये भारत सरकारविरुद्धचा करवाद प्रकरणीचा खटला जिंकला आहे. यामुळे व्होडाफोनच्या समभागात तेजी दिसून येऊ शकते.
भारतातील सर्वांत मोठी वीज कंपनी असणाऱया टाटा पॉवर कंपनीने भारतीय आरोग्य क्षेत्रातील सर्वांत मोठे कारपोर्ट उभारण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्ससोबत वीजखरेदी करार केला आहे. शुक्रवारी टाटा पॉवरचे समभाग 5.25 टक्क्मयांनी वाढले होते. हा वाढीचा आलेख या आठवडय़ातही उंचावत जाण्याची शक्मयता असल्याने या समभागांची खरेदी फायदेशीर ठरेल. सिप्ला कंपनी अमेरिकेतील इनहेरल कंपनी खरेदी करणार आहे. या खरेदी व्यवहारानंतर अमेरिकन सरकारकडून सिप्लाला मोठय़ा ऑर्डर्स मिळण्याची शक्मयता आहे. कोरोना काळात सिप्लाच्या समभागांची भरारी लक्षात घेता या समभागांचा पोर्टफोलिओमधील समावेश आवश्यक ठरतो. मोरेटोरियमसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बँकिंग क्षेत्रातील समभागांसाठी महत्त्वाचा राहणार असल्याने त्यावर बारकाईने लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. याखेरीज आयसीआयसीआय लोम्बार्ड हा 1270 रुपये मूल्य असणारा समभागही 1320 रुपयांचे टार्गेट ठेवून खरेदी करुन ठेवावा. केंद्र सरकार घरगुती नैसर्गिक वायूच्या उत्पादनासाठी आधार मूल्य ठरवण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास ऑईल इंडिया, वेदांता, ओएनजीसी या कंपन्यांना फायदा होणार आहे. शेअर बाजारातील गडगडाटातही अनेक समभाग कासवगतीने का होईना आपली चढती परिक्रमा सुरु ठेवून असतात. अशा काही समभागांचा शोध घेणे आणि त्यांना आपल्या पोर्टफोलियोत सामील करुन नफा कमावणे आवश्यक ठरते. प्रिन्स पाईप्स हा यापैकीच एक समभाग. गेल्या 4 महिन्यात 232 टक्के परतावा या समभागांनी दिला आहे. शुक्रवारीही 8 टक्क्मयांनी या कंपनीचे समभाग वधारले आहेत. दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेल कंपनीची जून महिन्यातील ऍक्टिव्ह युजर्सची संख्या जिओपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. येत्या सहा महिन्यात एअरटेलचे समभाग चांगल्या पद्धतीने वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे याचा विचार निश्चितच लाभदायक ठरेल. 29 सप्टेंबर रोजी युटीआय एएमसीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. कंपनीला तीन हजार कोटी रुपये जमवायचे आहेत. या आयपीओची खरेदी भविष्यासाठी लाभदायक ठरेल. याखेरीज माझगांव डॉकचा आयपीओही याच दिवशी येणार आहे. हा आयपीओही चुकवू नये. हैदराबादमधील लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही तेल आणि गॅस पाईपलाईन सेवा देणारी कंपनीही 29 सप्टेंबर रोजी आयपीओ खुला करणार असून त्याचाही सौदा फायदेशीर ठरू शकतो.
आधी उल्लेखल्यानुसार, शेअर बाजारातील हेलकावे याही आठवडय़ात कायम राहण्याची शक्मयता आहे. कारण बाजारावर विदेशी घटनांचा दबाव अधिक दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अपडेट घेत समभागांची खरेदी-विक्री करावी.
– संदीप पाटील