सर्वाधिक तापमानाची नोंद, तीन दिवसात पाच अंशाने वाढला पारा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मागील तीन दिवसांपासून सूर्यनारायण तापू लागल्याने तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहेत. उकाडा वाढला आहे. शुक्रवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमान 40.3 वर पोहोचले होते. किमान तापमानातही दोन अंशाची वाढ झाली.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागला होता. दरम्यान दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमान 38 तर किमान तापमान 21 अंशावर स्थिर राहिले होते. मागील आठवड्यात पावसाचा शिडकाव झाल्याने तापमान 35.9 अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर मात्र वातावरणात उकाडा जाणवू लागला होता. मंगळवारी कमाल तापमान 35.9 तर किमान 20.3 अंशावर होते. अवघ्या तीन दिवसात तापमानात 4.7 अंशाची वाढ झाली. शुक्रवारी तापमानाने 40 शी गाठली.
असा वाढत गेला तापमानाचा पारा
22 मार्च – सोमवार – कमाल 38.4 किमान 21.5 23 मार्च – मंगळवार – कमाल 35.9, किमान 20.3 24 मार्च – बुधवारी – कमाल 38.2, किमान 21.3 25 मार्च – गुरुवारी – कमाल 39.1, किमान 22.9 26 मार्च – शुक्रवारी – कमाल 40.3 किमान 22.6 |